शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

मंडलनिहाय नोंदीने पावसाचे वास्तव स्पष्ट

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस : पाण्याची बिकट परिस्थिती

६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस : पाण्याची बिकट परिस्थिती
अरुण बारसकर
सोलापूर: अवघा १६ टक्के पाऊस झाल्याने सोलापूर जिल्‘ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्‘ातील ९१ मंडलांपैकी ६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे जमिनीतील पाणी पातळी खोलवर जात आहे.
राज्याच्या तुलनेत सोलापूर जिल्‘ात निचांकी पाऊस पडला आहे. जिल्‘ात अवघा १६ टक्के पाऊस पडला आहे. एकीकडे सोलापूर जिल्‘ात पाऊस नाही तर दुसरीकडे उजनी धरणातील पाणीही कमी होत आहे. यामुळे पाण्याची स्थिती अधिकच नाजूक बनू लागली आहे. सोलापूर जिल्‘ातील ९१ मंडलांपैकी ६६ मंडलांमध्ये यावर्षीच्या पावसाळ्यात १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. अवघ्या २५ मंडलात १०० मि.मी. पेक्षा अधिक अन् १५० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्‘ात आतापर्यंत एकूण ८४५ मि.मी. इतका तर सरासरी ७७ मि. मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच कालावधीत एकूण १७८९ मि.मी. व सरासरी १६२ मि.मी. इतका पाऊस पडला होता. बागायती क्षेत्रासाठीच्या स्पर्धेमुळे बोअरवेलने केलेली जमिनीची चाळण व पाऊस गायब झाल्याने शेतीपिके दिसेनाशी झाली आहेत.
चौकट
यंदा पाऊसच पडला नाही
जिल्‘ातील दहिगाव(माळशिरस), मंडलामध्ये १४ मि.मी.,कोळा(सांगोला) या मंडलात १५ मि.मी. पाऊस पडला आहे. हा पाऊस मागील तीन महिन्यात पडला आहे. अन्य मंडलातील अनेक गावात यावर्षी पावसाचा थेंबही पडला नाही. कधीतरी अन् एखाद्या गावात चार-चार थेंब पडलेल्या पावसाची आकडेवारी १४ मि.मी. पर्यंत पोहोचली आहे.
चौकट
० मैंदर्गीत सर्वाधिक पाऊस..
मार्डी, मुस्ती, बार्शी, खांडवी, आगळगाव, पांगरी, पानगाव, नारी, सुर्डी, वागदरी, चपळगाव, मैंदर्गी, तडवळ, करजगी, नरखेड,रांझणी, कुर्डूवाडी, म्हैसगाव, करमाळा, केम, अर्जुननगर, पंढरपूर, तुंगत, पुळूज, बोराळे या मंडलामध्ये १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वाधिक १६९ मि.मी. पाऊस मैंदर्गी मंडलामध्ये पडला आहे.
० शेळगी, वळसंग, बोरामणी, जेऊर(अक्कलकोट), वाघोली, कामती बु., पेनूर, टाकळी सिकंदर, जेऊर(करमाळा), उमरड, कासेगाव(पंढरपूर), भंडीशेगाव, पटवर्धनकुरोली, हतीद, शिवणे या मंडलामध्ये २५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे.
चौकट
तर वाळवंटाचे स्वरूप..
सोलापूर जिल्‘ात बागायती क्षेत्र वाढीसाठी ७०० फुटांपेक्षा अधिक खोलीचे बोअरवेल घेतले आहेत. हे बोअरवेल सध्या कोरडे पडू लागले आहेत. २००-३०० फुटांपर्यंतचे अनेक भागातील बोअर केव्हाच कोरडे पडले आहेत. आगामी कालावधीत पाऊस नाही पडला तर जिल्‘ाला वाळवंटासारखे स्वरूप येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.