मंडलनिहाय नोंदीने पावसाचे वास्तव स्पष्ट
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस : पाण्याची बिकट परिस्थिती
मंडलनिहाय नोंदीने पावसाचे वास्तव स्पष्ट
६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस : पाण्याची बिकट परिस्थितीअरुण बारसकरसोलापूर: अवघा १६ टक्के पाऊस झाल्याने सोलापूर जिल्ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ातील ९१ मंडलांपैकी ६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे जमिनीतील पाणी पातळी खोलवर जात आहे.राज्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ात निचांकी पाऊस पडला आहे. जिल्ात अवघा १६ टक्के पाऊस पडला आहे. एकीकडे सोलापूर जिल्ात पाऊस नाही तर दुसरीकडे उजनी धरणातील पाणीही कमी होत आहे. यामुळे पाण्याची स्थिती अधिकच नाजूक बनू लागली आहे. सोलापूर जिल्ातील ९१ मंडलांपैकी ६६ मंडलांमध्ये यावर्षीच्या पावसाळ्यात १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. अवघ्या २५ मंडलात १०० मि.मी. पेक्षा अधिक अन् १५० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ात आतापर्यंत एकूण ८४५ मि.मी. इतका तर सरासरी ७७ मि. मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच कालावधीत एकूण १७८९ मि.मी. व सरासरी १६२ मि.मी. इतका पाऊस पडला होता. बागायती क्षेत्रासाठीच्या स्पर्धेमुळे बोअरवेलने केलेली जमिनीची चाळण व पाऊस गायब झाल्याने शेतीपिके दिसेनाशी झाली आहेत.चौकटयंदा पाऊसच पडला नाहीजिल्ातील दहिगाव(माळशिरस), मंडलामध्ये १४ मि.मी.,कोळा(सांगोला) या मंडलात १५ मि.मी. पाऊस पडला आहे. हा पाऊस मागील तीन महिन्यात पडला आहे. अन्य मंडलातील अनेक गावात यावर्षी पावसाचा थेंबही पडला नाही. कधीतरी अन् एखाद्या गावात चार-चार थेंब पडलेल्या पावसाची आकडेवारी १४ मि.मी. पर्यंत पोहोचली आहे.चौकट० मैंदर्गीत सर्वाधिक पाऊस..मार्डी, मुस्ती, बार्शी, खांडवी, आगळगाव, पांगरी, पानगाव, नारी, सुर्डी, वागदरी, चपळगाव, मैंदर्गी, तडवळ, करजगी, नरखेड,रांझणी, कुर्डूवाडी, म्हैसगाव, करमाळा, केम, अर्जुननगर, पंढरपूर, तुंगत, पुळूज, बोराळे या मंडलामध्ये १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वाधिक १६९ मि.मी. पाऊस मैंदर्गी मंडलामध्ये पडला आहे. ० शेळगी, वळसंग, बोरामणी, जेऊर(अक्कलकोट), वाघोली, कामती बु., पेनूर, टाकळी सिकंदर, जेऊर(करमाळा), उमरड, कासेगाव(पंढरपूर), भंडीशेगाव, पटवर्धनकुरोली, हतीद, शिवणे या मंडलामध्ये २५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे. चौकटतर वाळवंटाचे स्वरूप..सोलापूर जिल्ात बागायती क्षेत्र वाढीसाठी ७०० फुटांपेक्षा अधिक खोलीचे बोअरवेल घेतले आहेत. हे बोअरवेल सध्या कोरडे पडू लागले आहेत. २००-३०० फुटांपर्यंतचे अनेक भागातील बोअर केव्हाच कोरडे पडले आहेत. आगामी कालावधीत पाऊस नाही पडला तर जिल्ाला वाळवंटासारखे स्वरूप येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.