शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

मंडलनिहाय नोंदीने पावसाचे वास्तव स्पष्ट

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस : पाण्याची बिकट परिस्थिती

६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस : पाण्याची बिकट परिस्थिती
अरुण बारसकर
सोलापूर: अवघा १६ टक्के पाऊस झाल्याने सोलापूर जिल्‘ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्‘ातील ९१ मंडलांपैकी ६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे जमिनीतील पाणी पातळी खोलवर जात आहे.
राज्याच्या तुलनेत सोलापूर जिल्‘ात निचांकी पाऊस पडला आहे. जिल्‘ात अवघा १६ टक्के पाऊस पडला आहे. एकीकडे सोलापूर जिल्‘ात पाऊस नाही तर दुसरीकडे उजनी धरणातील पाणीही कमी होत आहे. यामुळे पाण्याची स्थिती अधिकच नाजूक बनू लागली आहे. सोलापूर जिल्‘ातील ९१ मंडलांपैकी ६६ मंडलांमध्ये यावर्षीच्या पावसाळ्यात १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. अवघ्या २५ मंडलात १०० मि.मी. पेक्षा अधिक अन् १५० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्‘ात आतापर्यंत एकूण ८४५ मि.मी. इतका तर सरासरी ७७ मि. मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच कालावधीत एकूण १७८९ मि.मी. व सरासरी १६२ मि.मी. इतका पाऊस पडला होता. बागायती क्षेत्रासाठीच्या स्पर्धेमुळे बोअरवेलने केलेली जमिनीची चाळण व पाऊस गायब झाल्याने शेतीपिके दिसेनाशी झाली आहेत.
चौकट
यंदा पाऊसच पडला नाही
जिल्‘ातील दहिगाव(माळशिरस), मंडलामध्ये १४ मि.मी.,कोळा(सांगोला) या मंडलात १५ मि.मी. पाऊस पडला आहे. हा पाऊस मागील तीन महिन्यात पडला आहे. अन्य मंडलातील अनेक गावात यावर्षी पावसाचा थेंबही पडला नाही. कधीतरी अन् एखाद्या गावात चार-चार थेंब पडलेल्या पावसाची आकडेवारी १४ मि.मी. पर्यंत पोहोचली आहे.
चौकट
० मैंदर्गीत सर्वाधिक पाऊस..
मार्डी, मुस्ती, बार्शी, खांडवी, आगळगाव, पांगरी, पानगाव, नारी, सुर्डी, वागदरी, चपळगाव, मैंदर्गी, तडवळ, करजगी, नरखेड,रांझणी, कुर्डूवाडी, म्हैसगाव, करमाळा, केम, अर्जुननगर, पंढरपूर, तुंगत, पुळूज, बोराळे या मंडलामध्ये १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वाधिक १६९ मि.मी. पाऊस मैंदर्गी मंडलामध्ये पडला आहे.
० शेळगी, वळसंग, बोरामणी, जेऊर(अक्कलकोट), वाघोली, कामती बु., पेनूर, टाकळी सिकंदर, जेऊर(करमाळा), उमरड, कासेगाव(पंढरपूर), भंडीशेगाव, पटवर्धनकुरोली, हतीद, शिवणे या मंडलामध्ये २५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे.
चौकट
तर वाळवंटाचे स्वरूप..
सोलापूर जिल्‘ात बागायती क्षेत्र वाढीसाठी ७०० फुटांपेक्षा अधिक खोलीचे बोअरवेल घेतले आहेत. हे बोअरवेल सध्या कोरडे पडू लागले आहेत. २००-३०० फुटांपर्यंतचे अनेक भागातील बोअर केव्हाच कोरडे पडले आहेत. आगामी कालावधीत पाऊस नाही पडला तर जिल्‘ाला वाळवंटासारखे स्वरूप येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.