शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेत पुन्हा रंगणार ‘मानापमान’ नाट्य

By admin | Updated: October 20, 2014 06:10 IST

आपल्यालाच सरकार स्थापनेची संधी मिळणार याची खात्री असल्याने भाजपाला घाईघाईने बहुमताची जुळवाजुळव करण्याची गरज नाही.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीनिवडणुकीआधी युती तुटली असली तरी आता महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पुन्हा शिवसेनेला बरोबर घ्यावे, असे मत ‘अडगळीत’ गेलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा त्यासाठी तयार होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही.आपल्यालाच सरकार स्थापनेची संधी मिळणार याची खात्री असल्याने भाजपाला घाईघाईने बहुमताची जुळवाजुळव करण्याची गरज नाही. दुसरे असे की, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:हून बाहेरून पाठिंब्याची तयारी दर्शविली असल्याने भाजपाचे काम काही प्रमाणात सोपेही झाले आहे.आडवाणी यांचा सल्ला ऐकून पाठिंब्यासाठी शिवसेनेपुढे स्वत:हून हात पसरण्यास भाजपाचे पक्षनेते राजी नसण्याचे प्रमुख कारण निवडणूक प्रचाराच्या काळात शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रातून मोदी यांच्याविरुद्ध गरळ ओकली जाणे हे आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या नितांत आदरापोटी आपण प्रचारात शिवसेनेविरुद्ध एकही शब्द बोलणार नाही, असे मोदी यांनी सांगितले असले तरी पक्षातील इतर नेत्यांनी ही मर्यादा पाळलेली नाही. मतदानाच्या काही दिवस आधी ‘दोपहर का सामना’मध्ये मोदींच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख करून केले गेलेले विखारी लिखाण भाजपाचे नेते विसरलेले नाहीत. यावरून आलेली कटुता दूर झाली नसल्याने शिवसेनेला पुन्हा खुल्या दिलाने मिठी मारण्यावरून या नेत्यांच्या मनात किंतु आहे. शिवसेनेने असे जाहीरपणे वक्तव्य केल्यानंतर आम्ही स्वत:हून का हात पसरवावे, असे मोदी-शहा गटाचे कट्टरपंथी विचारत आहेत.पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले नसले तरी ‘आम्ही नव्हे तर त्यांनीच केवळ तीन जागांसाठी युती तोडली’ हे सांगतानाच त्यांचा रोख याकडेच संकेत करणारा होता. (प्रतिनिधी)