शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

भाजपा-शिवसेनेत पुन्हा रंगणार ‘मानापमान’ नाट्य

By admin | Updated: October 20, 2014 06:10 IST

आपल्यालाच सरकार स्थापनेची संधी मिळणार याची खात्री असल्याने भाजपाला घाईघाईने बहुमताची जुळवाजुळव करण्याची गरज नाही.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीनिवडणुकीआधी युती तुटली असली तरी आता महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पुन्हा शिवसेनेला बरोबर घ्यावे, असे मत ‘अडगळीत’ गेलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा त्यासाठी तयार होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही.आपल्यालाच सरकार स्थापनेची संधी मिळणार याची खात्री असल्याने भाजपाला घाईघाईने बहुमताची जुळवाजुळव करण्याची गरज नाही. दुसरे असे की, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:हून बाहेरून पाठिंब्याची तयारी दर्शविली असल्याने भाजपाचे काम काही प्रमाणात सोपेही झाले आहे.आडवाणी यांचा सल्ला ऐकून पाठिंब्यासाठी शिवसेनेपुढे स्वत:हून हात पसरण्यास भाजपाचे पक्षनेते राजी नसण्याचे प्रमुख कारण निवडणूक प्रचाराच्या काळात शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रातून मोदी यांच्याविरुद्ध गरळ ओकली जाणे हे आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या नितांत आदरापोटी आपण प्रचारात शिवसेनेविरुद्ध एकही शब्द बोलणार नाही, असे मोदी यांनी सांगितले असले तरी पक्षातील इतर नेत्यांनी ही मर्यादा पाळलेली नाही. मतदानाच्या काही दिवस आधी ‘दोपहर का सामना’मध्ये मोदींच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख करून केले गेलेले विखारी लिखाण भाजपाचे नेते विसरलेले नाहीत. यावरून आलेली कटुता दूर झाली नसल्याने शिवसेनेला पुन्हा खुल्या दिलाने मिठी मारण्यावरून या नेत्यांच्या मनात किंतु आहे. शिवसेनेने असे जाहीरपणे वक्तव्य केल्यानंतर आम्ही स्वत:हून का हात पसरवावे, असे मोदी-शहा गटाचे कट्टरपंथी विचारत आहेत.पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले नसले तरी ‘आम्ही नव्हे तर त्यांनीच केवळ तीन जागांसाठी युती तोडली’ हे सांगतानाच त्यांचा रोख याकडेच संकेत करणारा होता. (प्रतिनिधी)