शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
5
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
6
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
7
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
8
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
9
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
10
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
11
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
12
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
13
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
14
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
15
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
16
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
17
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
18
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
19
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
20
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
Daily Top 2Weekly Top 5

'मानव नेहमीसाठी पृथ्वीवर राहणार नाही, नामशेष होईल म्हणूनच...' ISRO प्रमुखांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 19:24 IST

'पृथ्वी नेहमीसाठी सुरक्षित राहणार नाही, मानवदेखील डायनासोरप्रमाणे नामशेष होईल.'

नवी दिल्ली: सध्या जगातील अनेक देश चंद्र आणि मंगळावर राहण्याच्या शक्यता पडताळत आहेत. याबाबत अनेक वर्षांपासून संशोधनदेखील सुरू आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी चंद्र आणि मंगळवार राहण्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. अनेकजण विचारतात की मानवाला अवकाशात पाठवण्याची काय गरज? आपली पृथ्वी राहण्यासाठी योग्य जागा आहे, मग अवकाश प्रवास कशाला? याला उत्तर देताना इस्रो प्रमुख म्हणाले की, 'डायनासोरप्रमाणे एक दिवस मानव पृथ्वीवरुन नष्ट होईल. एकतर तो स्वत: याला जबाबदार असेल किंवा निसर्ग त्याला नष्ट करेल.'

एका कार्यक्रमात बोलताना इस्रो प्रमुख म्हणाले की, 'चंद्र आणि मंगळावर सातत्याने लघुग्रहांचा आघात होत असतो. कारण तेथील वातावरण आणि संरक्षणासाठी उपलब्ध नसलेले तंत्रज्ञान. पण, पृथ्वीवर अनुकूल वातावरण आहे, ज्यामुळे आपण अनेक वर्षांपासून लघुग्रहांच्या हल्ल्यापासून वाचत आलो आहोत. पण, मानव पृथ्वीवर कायम राहणार नाही. डायनासोर नष्ट झाले, त्याप्रमाणे मानवदेखील नष्ट होईल. मानवाने राहण्यासाठी नवीन जागा शोधली नाही, तर एक दिवस पृथ्वीसह मानवाचाही अंत होईल.'

मानवी अंतराळ उड्डाणाची का गरज आहे?'अंतराळ संशोधनासाठी अंटार्क्टिकावर जगभरातील अनेक देशांनी केंद्रे उभारली आहेत. भारताचेही तेथे तीन केंद्रे आहेत. याची काय गरज काय होती? भविष्यात आपण ठराविक क्षेत्रात पाऊल ठेवले नाही तर आपण तेथून बाहेर फेकले जाऊ. भारताने चंद्रावर पाऊल ठेवले नाही तर भविष्यात जगभरातील लोक तेथे जातील आणि भारताला येऊ देणार नाहीत. त्यामुळेच या अभ्यासासाठी भारताने अंटार्क्टिकामध्ये केंद्र उभारले आहे.' 

लवकरच भारताचे स्पेश स्टेशन असेलसोमनाथ पुढे म्हणाले की, 'गगनयान हा एक नवीन प्रयत्न आहे. यावर्षी आपण मानवी स्पेसफ्लाइट एक्सपो सुरू करत आहोत. 100 वर्षांनंतर आपण अंतराळात आपले स्पेस स्टेशन बनवू. फक्त गगनयानापर्यंत थांबणार नाही. भविष्यात जगातील मोठ्या अंतराळ मोहिमेत अनेक मोठे देश सामील होतील, तेव्हा त्यात भारतातील अंतराळवीरांचाही समावेश असायला हवा.' 

पुढच्या पिढ्या सौरमालेच्या बाहेर जातीलसोमनाथ म्हणाले की, 'भारताने चांद्रयान-1, मंगळयान यासह अनेक मोहिमा केल्या आहेत, ज्यामुळे आपला देश, आपले शास्त्रज्ञ, आपले लोक आणि आपली इस्रो जगातील कोणत्याही देशाशी स्पर्धा करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. पण आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांची सुरक्षा, आरोग्य आणि समृद्धी. म्हणूनच आम्ही त्यांना हवामान, शेती, आपत्ती, जलवाहतूक, दळणवळण अशा सुविधा देत आहोत. आपल्या पुढच्या पिढ्या केवळ इतर ग्रहांवरच नव्हे तर सूर्यमालेतील आणि त्यापुढील ग्रहांवरही जातील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :isroइस्रोNASAनासाMarsमंगळ ग्रह