शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अजूनही पूर्वी प्रमाणेच घातक!, स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी करायला सांगितला 'हा' मोठा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 13:34 IST

पंतप्रधान दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशातील जनतेशी संवाद साधतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशाच्या ताज्या स्थितीशी संबंधित अनेक घटनांचा परिचय जनतेला करून देतात. 

ठळक मुद्देकोरोना अजूनही तेवढाच घातक आहे, जेवढा तो सुरुवातीला होता.मोदींनी मिथिला पेंटिंग बरोबरच आसाममध्ये बांबूच्या वस्थू तयार करून आत्मनिर्भर होत असलेल्या नागरिकांची गोष्टही देशाला सांगितली. आपला देश ज्या उंचीवर उभा आहे, त्या पाठीशी अनेक महान विभूतींची तपश्चर्या आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) त्यांच्या नियोजित 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहार आणि आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीपासून ते कोरोना महामारीच्या संकटापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. सर्वात महत्वाचे म्हणजे, "लक्षात असू द्या, की कोरोना अजूनही तेवढाच घातक आहे, जेवढा तो सुरुवातीला होता. यामुळे आपल्याला पूर्णपणे सावध राहायचे आहे, असे मोदी म्हणाले. 

मोदी म्हणाले, मी आपल्याला आग्रह करेन, की मास्कमुळे त्रास होत असेल आणि मनात आले, की मास्क काढून टाकावा, तेव्हा क्षणभरासाठी त्या डॉक्टरांचे, त्या नर्सेसचे आणि आपल्या कोरोना वॉरियर्सचे स्मरण करा. जे मास्क परिधान करूनच तासंतास, सातत्याने, आपल्या सर्वांचे जीवन वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

यावेळी पंतप्रधान मोदींनी, स्वातंत्र दिनानिमित्त जनतेला कोरोना महामारीपासून मुक्त होण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. तसेच कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. यामुळे मास्कचा वापर नक्की करा, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मिथिला पेंटिंग बरोबरच आसाममध्ये बांबूच्या वस्थू तयार करून आत्मनिर्भर होत असलेल्या नागरिकांची गोष्टही देशाला सांगितली. 

आज आपला देश ज्या उंचीवर उभा आहे, त्या पाठीशी अनेक महान विभूतींची तपश्चर्या आहे. ज्यांनी राष्ट्र निर्माणासाठी आपले जीवन समर्पित केले. अशाच महान विभूतींपैकी एक लोकमान्य टिळक. 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्य टिळकांची 100वी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचे जीवन आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे. ते आपल्या सर्वांना खूप काही शिकवते, असे मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील विरांना मानवंदना दिली. तसेच युद्धकाळातील वर्तनाबाबत देशवासियांना मोलाचा सल्ला दिला. यावेळी, युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबीयांच्या मनोधैर्यावर थेट परिणाम होत आसतो. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आमचे वर्तन, आमचा व्यवहार, आमची वाणी, आमची विधाने, आमच्या मर्यादा आणि आमचे लक्ष्य या सर्वामध्ये आपण जे काही करत आहोत, त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढले पाहिजे. तसेच त्यांच्या सन्मान वाढला पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशातील जनतेशी संवाद साधतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशाच्या ताज्या स्थितीशी संबंधित अनेक घटनांचा परिचय जनतेला करून देतात. 

महत्त्वाच्या बातम्या -

"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याLokmanya Tilakलोकमान्य टिळकBiharबिहार