शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

...अन् त्यानं काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत फडकावला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:41 IST

बुधवारी काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ झाला आहे.

नवी दिल्ली- बुधवारी काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ झाला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान एक व्यक्ती अचानक तिरंगा हातात घेऊन मध्येच येऊन उभा राहिला. त्यानं काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केला आणि योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिश्ट म्हणणं म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान असल्याचं सांगितलं. तसेच त्यानं वंदे मातरम, भारत माता की जयच्याही घोषणा दिल्या. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच खळबळ उडाली.या व्यक्तीचं नाव नचिकेता वाल्हेकर असून, तो महाराष्ट्रातल्या हिम्मतनगरमधला रहिवासी आहे. तो भाजपा कार्यकर्ता असल्याचंही म्हटलं जातंय. तो म्हणाला, त्यांची ममता बॅनर्जींचं नाव घेण्याची हिंमत होत नाही. त्यांना निवडणूक सांभाळता येत नाही. असे लोक फक्त मोदी-शहा, मोदी-शहा करतात. मोदी-शाहांनी देशासाठी बरंच काही केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमधील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यात अपयश आल्याचं म्हटलं आहे. लोकसभेत होत असलेल्या पराभवामुळेच काँग्रेस असे आरोप करत असल्याचंही तो म्हणाला आहे.रायबरेलीमध्ये काँग्रेसचे आमदार अदिती सिंह झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत पवन खेडा म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये जी हिंसा झाली, आमच्या आमदारावर जीवघेणा हल्ला झाला. आज प्रियंका तिकडे गेल्या आहेत. इथे आपल्याला मोदी-शाह मॉडल दिसेल. मोदी-शाह मॉडल बंगालमध्येही आहे आणि उत्तर प्रदेशमध्येही आहे.  जसं उत्तर प्रदेशात आमदार सुरक्षित नाहीत. हे अजय सिंह बिश्त आणि मोदी-शाह मॉडल आहे. विचार करा लोकांची अवस्था काय होत असेल. उत्तर प्रदेश राज्यातील व्यवस्था बिघडली आहे. मोदी-शाहांचे फक्त 8-9 दिवस बाकी आहेत, असंही काँग्रेसवाले म्हणाले आहेत.