शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

लग्नानंतर तीनच महिन्याच 'त्याने' प्रियकराबरोबर लावलं पत्नीचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 12:26 IST

लग्नाच्या तीनच महिन्यात त्याने पत्नीचं प्रियकराशी लग्न लावून दिलं.

कानपूर- बॉलिवूड सिनेमा 'हम दिल दे चुके सनम' सारखी वाटणारी ही कथा आहे. सिनेमाच्या कथेप्रमाणे वाटणारी ही घटना आहे कानपूरमधील. इथल्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचं लग्न प्रियकराबरोबर लावून दिलं. विशेष म्हणजे लग्नाच्या तीनच महिन्यात त्याने पत्नीचं प्रियकराशी लग्न लावून दिलं. कानपूरमधील सनिग्वन गावातील ही घटना आहे. सुजीत असं या व्यक्तीचं नाव असून सुजीतने त्याची पत्नी शांतीचं लग्न तिचा प्रियकर रवीबरोबर लावून दिलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

19 फेब्रुवारी रोजी सुजित आणि शांतीचं लग्न झालं होतं. लग्नानंतर पंधरा दिवस शांती सासरी राहिली व त्यानंतर ती काही दिवसांसाठी माहेरी गेली. 'अनेक दिवस होऊनही शांती घरी न परतल्याने सुजितने तिला सासरी न येण्याचं कारण विचारलं. सुरूवातीला शांतीने सुजितच्या विचारणेकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर तिने घडलेल्या सर्व घटना त्याला सांगितल्या. लखनऊमधील रवी नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. पण कुटुंबीयांनी माझ्या मर्जीच्या विरोधात लग्न लावून दिलं, असं शांतीने सुजितला सांगितलं. शांतीकडून सर्व प्रकार ऐकल्यावर रवीला तिच्या आयुष्यात परत आणणार असल्याचं वचन सुजितने शांतीला दिलं. 

काही दिवसांनी सुजित शांतीचा प्रियकर रवीला भेटला. रवीनेही सुजितसमोर शांतीबरोबरच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर सुजितने शांती व रवी यांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं, तशी माहिती त्याने स्थानिक पोलिसांना दिल्याचं सुत्रांनी सांगितलं. बुधवारी सुजित, शांती व रवी तेथिल हनुमान मंदिरात जमले व तेथे सुजितने शांती व रवीचं लग्न लावून दिलं.