शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'त्यानं' शरीरावर गोंदवले 591 टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 15:18 IST

दिल्लीच्या एका तरुणाने शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. तरुणाने स्वतःच्या शरीरावर तब्बल 591 टॅटू गोंदवले आहेत.

ठळक मुद्देदिल्लीच्या एका तरुणाने शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.तरुणाने स्वतःच्या शरीरावर तब्बल 591 टॅटू गोंदवले आहेत.अभिषेक गौतम असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव असून तो इंटिरिअर डिझायनर आहे.

नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दिल्लीच्या एका तरुणाने शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. तरुणाने स्वतःच्या शरीरावर तब्बल 591 टॅटू गोंदवले आहेत. अभिषेक गौतम असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव असून तो इंटिरिअर डिझायनर आहे. कारगील युद्धात वीरमरण आलेल्या 559 सैनिकांची नावं आणि काही थोर व्यक्तींच्या प्रतिमा असे 591 टॅटू काढले आहेत.

अभिषेकला हे टॅटू गोंदवण्यासाठी आठ दिवस लागले. तसेच जूनपासून तो त्याच्या बाईकवरून देशभर तब्बल 15 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या प्रवासात प्रत्येक दिवशी एका शहीद जवानाच्या कुटुंबीयांची तो  भेट घेणार आहे. अभिषेक 24 ते 26 जुलै दरम्यान कारगीलमध्ये असणार आहे. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. या हल्लाबाबत अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे. 'मला ठावूक आहे की अनेकांना युद्ध हवे आहे, पण युद्ध हा उपाय नव्हे. खूप लोक युद्धात मारले जातील. आपण नंतर ते विसरून जाऊ मात्र शहिदांच्या कुटुंबीयांना त्याचा सामना करावा लागेल' असे अभिषेकने म्हटले आहे.

दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे.  दहशतवाद्यांनी एकतर हत्यारं सोडून समर्पण करावं किंवा मग मरणास सामोरं जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराच भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिला आहे. ''दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे'',असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसंच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवली जाईल आणि काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही', असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले आहे. 

टॅग्स :Soldierसैनिकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला