शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

‘नीती’च्या बैठकीला ममता राहणार गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 03:58 IST

पंतप्रधानांना लिहिले पत्र; राज्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नीती आयोगाला नाहीत

कोलकाता : नीती आयोगाच्या १५ जून रोजी होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहून काहीही फलनिष्पत्ती निघणार नाही. त्यामुळे या बैठकीला आपण येत नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्राद्वारे कळविले आहे. राज्यांच्या योजनांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नीती आयोगाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नीती आयोगाला कोणतेही वित्तीय अधिकार नाहीत. या आयोगाच्या गेल्या साडेचार वर्षांतील बैठकांच्या अनुभवावरून यापूर्वी केलेली सूचना पुन्हा करावीशी वाटते. संघराज्यरचना व त्यातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी राज्यघटनेच्या २६३ कलमाच्या आधारे आंतरराज्यीय कौन्सिलची (आयएससी) स्थापना करण्यात आली होती. आयएससीला राज्याराज्यांतील प्रश्नांची तड लावणारी मुख्य संस्था बनवण्याकरिता काळाच्या गरजेनुसार तिच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात यावी. आयएससीचा पाया विस्तारण्याठी तिच्यामध्ये नॅशनल डेव्हलपमेन्ट कौन्सिलही विलीन करण्यात यावी.

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया नीती आयोगाच्या आगामी बैठकीत देशाच्या विकासासंबंधी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)तृणमूल काँग्रेस, भाजपतील मतभेद उफाळले

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये या राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकून भाजपने तृणमूल काँग्रेसला चांगलीच टक्कर दिली आहे. २०१२ साली पश्चिम बंगालमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकांत आम्ही तृणमूल काँग्रेसचा पराभव करू अशी वक्तव्ये भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या ३२ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकांत या पक्षाने फक्त २२ जागा जिंकल्या होत्या. या संघर्षामुळे तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये सध्या मोठा तणाव आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी