शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

ममता बॅनर्जींनी ट्रॅक बदलला! सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने सुरु केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 1:25 PM

पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागामध्ये भाजपाने पक्षविस्तार सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आपल्या राजकीय रणनितीमध्ये बदल करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे. 26 डिसेंबरला ममता बॅनर्जी गंगासागरला गेल्या होत्या, तिथे त्या तासभर कपिलमुनींच्या आश्रमात थांबल्या होत्या.ममता बॅनर्जी यांच्यावर अल्पसंख्यांकांच्या तृष्टीकरणाचा आरोप होत आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागामध्ये भाजपाने पक्षविस्तार सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आपल्या राजकीय रणनितीमध्ये बदल करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मागच्या काही काळात ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन त्या हिंदुत्वाच्या विरोधात असल्याची त्यांची प्रतिमा भाजपाने तयार केली आहे. हीच प्रतिमा बदलण्याचा ममता बॅनर्जींनी प्रयत्न सुरु केला आहे. 

आपण हिंदुंच्या विरोधात नाही. सहिष्णू हिंदू आहोत हा संदेश देण्याचा ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत. 26 डिसेंबरला ममता बॅनर्जी गंगासागरला गेल्या होत्या. तिथे त्या तासभर कपिलमुनींच्या आश्रमात थांबल्या होत्या. मुख्य पूजारी ग्यानदासजी यांच्याबरोबर त्यांनी तासभर चर्चा केली. ममता बॅनर्जींच्या या गंगासागर भेटीकडे विश्लेषक राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. 

गंगासागरमधून गंगा नदी वाहते. येत्या 14 जानेवारीला मकरसंक्रातीला लाखो लोक पवित्र स्नानासाठी इथे येतात. मी पुन्हा गंगासागरला येईन असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर अल्पसंख्यांकांच्या तृष्टीकरणाचा आरोप होत आहे. त्याचमुळे संतुलन साधण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून आता असे प्रयत्न होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. 

बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या मताधिक्क्यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली. साबांग आणि डाकक्षीन कांथी येथे पक्ष संघटना नसतानाही भाजपाला ब-यापैकी मते मिळाली. साबांग विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये तृणमुल काँग्रेसला 1 लाख 6 हजाराहून जास्त मते मिळाली होती. त्यावेळी भाजपाला फक्त 5610 मते होती. पण पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला 37 हजार 476 मते मिळाली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी रणनिती बदलल्याची चर्चा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाची दिशा पकडल्याचा संदेश त्यातून गेला आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या जागा वाढण्यामध्ये झाला. त्यामुळे ममता बॅनर्जी आता त्याच दिशेने जात आहेत.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी