शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ममता बॅनर्जींची जीभ घसरली, राकेश रोशन यांच्यानंतर आता इंदिरा गांधींना पाठवलं चंद्रावर! म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 18:18 IST

अवकाशासंदर्भातील ज्ञानावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

अवकाशासंदर्भातील ज्ञानावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. खरे तर, ममता बॅनर्जी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची (AITC) विद्यार्थी शाखा असलेल्या तृणमूल छात्र परिषदेच्या (TMCP) स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका सभेला संबोधित करत होत्या.

यावेळी बोलताना ममता म्हणाल्या, ‘जेव्हा इंदिरा गांधी चंद्रावर पोहोचल्या, तेव्हा त्यांनी राकेश (शर्मा) यांना विचारले की, तेथून भारत कसा दिसतो? त्यांनी उत्तर दिले, 'सारे जहां से अच्छा'. गेल्या आठवड्यात चंद्रयान -3 मिशनच्या यशा बद्दल इस्त्रोचे अभिनंदन करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते की, इंदिरा गांधी यांनी ‘राकेश रोशन’ यांना विचारले होते की, चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते? 

नेत्यांचे 'चंद्रज्ञान' -यापूर्वीही चंद्रयान-3 संदर्भात नेत्यांनी चुका केल्या आहेत. गेल्या आठवड्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना चंद्रयान-3 संदर्भात बोलण्यास सांगितले, तेव्हा त्यांना यासंदर्भात माहिती नसल्याचे दिसून आले. याशिवाय ओमप्रकाश राजभर, राजस्थानचे क्रीडामंत्री, अशोक चांदना यांनीही अशाचप्रकारे वक्तव्य केली. याची सोशल मीडियावरही चर्चा झाली.

एका वृत्त वाहीनीसोबत बोलताना ओमप्रकाश राजभर म्हणाले होते, ''जे वैज्ञानिक दिवस-रात्र संशोधन करून नव नवे संशोधन करतात, त्यांचे आम्ही अभिनंद करतो. जे चंद्रयान-3 संदर्भात बोलत आहेत, यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. उद्या पृथ्वीवर येण्याची त्याची जी वेळ आहे, आल्यानंतर, संपूर्ण देशाने त्याचे स्वागत करायला हवे.'' या वक्तव्यानंतर, सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.

तसेच, ''आपण यशस्वी झालो आणि सेफ लँडिंग झाले. आपले जे लोक गेले आहेत, त्यांना सॅल्यूट करतो. आपला देश सायंस आणि अवकाशात आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. त्यासाठी सर्व देशवासीयांना शुभेच्छा देतो.'' या वक्तव्यानंतर, लोकांनी सोशल मिडियावर अशोक चांदना यांना ट्रोल करायला सुरुवात केली. कारण चंद्रयात 3 हे मानव रहीत असल्याचे त्यांना माहीत नव्हते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीChandrayaan-3चंद्रयान-3west bengalपश्चिम बंगालIndira Gandhiइंदिरा गांधी