शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र, 23 जानेवारीला देशात 'राष्ट्रीय सुट्टी' जाहीर करा

By महेश गलांडे | Updated: November 18, 2020 17:49 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहले आहे. त्यामध्ये आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य सेनानी दिवंगत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहले आहे. त्यामध्ये आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य सेनानी दिवंगत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात, तसेच साठेबाजांवर कारवाई करावी आणि पुरवठा वाढवण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करा अशा मागण्या ममता बॅनर्जी यांनी पत्राद्वारे मोदींकडे केल्या आहेत. त्यानंतर, पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी मोदींना पत्र लिहिले असून भावनिक मुद्द्यांना हात घातला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीसंदर्भात हे पत्र लिहिले आहे.   

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहले आहे. त्यामध्ये आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य सेनानी दिवंगत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तसेच, सुभाष चंद्र बोस यांच्या निधनाचे गुढ शोधून काढावे, अशीही मागणी बॅनर्जी यांनी केली आहे. टाइम्स नॉऊने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबीयांनी मुखर्जी आयोगाच्या अहवालाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या अहवालात कुठलेही कारण किंवा माहिती न देताच, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मृत घोषित केलं आहे. नेताजी यांचे वंशज सूर्य बोस आणि माधुरी बोस यांनी एक खुले लिहिले आहे. त्यानुसार, 8 नोव्हेंबर 2005 च्या न्यायमूर्ती मनोज कुमार मुखर्जी यांच्या अहवलात असे नमूद केली की, नेताजी यांचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला नसून टोकियोतील रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजी यांच्या नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ उलगडण्यासाठी तपास करावा, अशी मागणी केली आहे.   

यापूर्वीच्या पत्रातील मागण्या

"केंद्र सरकारने साठेबाजीकडे गांभीर्याने पाहिलं पाहीजे. साठेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी, पुरवठा वाढवण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहेत. यासाठी तत्काळ पावलं उचलत राज्यांना शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे. कृषी उत्पादने, पुरवठा, वितरण आणि विक्रीवर नियंत्रण येणं आवश्यक आहे. असे नियंत्रण आणता यावे यासाठी राज्यांनी कायदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी" अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी पत्रामध्ये केली आहे. ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना चार पानी पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे.

राज्य सरकारला अधिकार द्यावेत

"राज्य सरकारला अशी शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे आणि राज्य सरकार सामान्य जनतेच्या समस्यांकडे पाहत मूकदर्शक बनून राहू शकत नाही. याचे कारण म्हणजे बटाटा आणि कांद्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडत आहेत" असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 23 सप्टेंबर रोजी संसदेने आवश्यक खाद्य पदार्थ (दुरुस्ती) विधेयत पारित करत, धान्य, डाळ, तेलबिया, खाद्यतेल, कांदे आणि बटाटा या पदार्थांना आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसNarendra Modiनरेंद्र मोदी