शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय मागे घ्या, ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 10:41 IST

त्रिपुरामधील भाजपचे सरकार आपल्या विरोधकांना त्रास देत आहे, निवडणूक काळात विरोधी पक्षांना प्रचारही करायला देत असून, नेत्यांना काही कारण नसताना अटक केली जात आहे, ही बाबही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली.

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचे विविध राज्यांतील कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय राज्यांच्या अधिकारांवर अन्याय करणारा असून, तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. मध्यंतरी केंद्र सरकारने सीमेवरील राज्यांतील सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला होता. कायदा व सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी आहे. आतील क्षेत्र वाढवल्याने पोलिसांच्या म्हणजेच पर्यायाने राज्यांच्या अधिकारांवर गदा आल्याचे ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना सांगितले.  त्रिपुरामधील भाजपचे सरकार आपल्या विरोधकांना त्रास देत आहे, निवडणूक काळात विरोधी पक्षांना प्रचारही करायला देत असून, नेत्यांना काही कारण नसताना अटक केली जात आहे, ही बाबही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली. तृणमूल काँग्रेसच्या सायली घोष यांनाही त्रिपुरा सरकारने अटक केल्याबद्दल ममता यांनी नाराजीही व्यक्त केली. 

पवार व ठाकरे यांनाही भेटणारममता बॅनर्जी म्हणाल्या की, आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहोत. ममता बॅनर्जी मध्यंतरी गोव्यात गेल्या होत्या. दोन दिवस दिल्लीत होत्या. आता त्या विविध राज्यांत जाणार असून, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी तेथील विरोधी नेत्यांना भेटणार आहेत. पवार व ठाकरे यांना त्या त्याच संदर्भात भेटणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीTripuraत्रिपुराwest bengalपश्चिम बंगाल