शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री म्हणतात, माझा फोन टॅप होतोय; पंतप्रधान मोदींनी यात लक्ष घालावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 09:15 IST

माझा फोन टॅप केला जात आहे. यामुळे मी फोनवर मोकळेपणाने बोलू शकत नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच माझा फोन टॅप केंद्र सरकार आणि दोन राज्य सरकारांच्या इशाऱ्यावरून होत आहे. यात एक राज्य भाजपशासित आहे. त्यामुळे सध्या जे सुरू आहे याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभिर्याने पाहायला हवे, असे आवाहन देखील ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माझा फोन टॅप केला जात आहे. यामुळे मी फोनवर मोकळेपणाने बोलू शकत नाही. तसेच व्हॅाट्सअॅपवरही हीच स्थिती आहे. मी जेव्हा एखाद्याला फोन करते, त्यावेळी कोणीतरी तो ऐकत असतो. तसेच पश्चिम बंगालमधील राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांच्यावर नजर ठेवली जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यपणे जगण्याचा अधिकार दिला असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यात डोकावू शकत नाही. तसेच तुम्हाला जर मोकळेपणाने बोलता येत नसेल तर हे कोणत्या प्रकराचे स्वातंत्र्य आहे असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपाबाबत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट करण्यापूर्वी प्रथम आपल्या राज्यातील समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार विरोधी पक्षांवर खोटे आरोप करत आहे. राज्यात रोज विरोधी पक्षाच्या नेत्यांची हत्या होत आहे. राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या फोन कॉल्सवर नजर ठेवण्याची यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा