शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

मुख्यमंत्री म्हणतात, माझा फोन टॅप होतोय; पंतप्रधान मोदींनी यात लक्ष घालावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 09:15 IST

माझा फोन टॅप केला जात आहे. यामुळे मी फोनवर मोकळेपणाने बोलू शकत नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच माझा फोन टॅप केंद्र सरकार आणि दोन राज्य सरकारांच्या इशाऱ्यावरून होत आहे. यात एक राज्य भाजपशासित आहे. त्यामुळे सध्या जे सुरू आहे याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभिर्याने पाहायला हवे, असे आवाहन देखील ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माझा फोन टॅप केला जात आहे. यामुळे मी फोनवर मोकळेपणाने बोलू शकत नाही. तसेच व्हॅाट्सअॅपवरही हीच स्थिती आहे. मी जेव्हा एखाद्याला फोन करते, त्यावेळी कोणीतरी तो ऐकत असतो. तसेच पश्चिम बंगालमधील राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांच्यावर नजर ठेवली जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यपणे जगण्याचा अधिकार दिला असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यात डोकावू शकत नाही. तसेच तुम्हाला जर मोकळेपणाने बोलता येत नसेल तर हे कोणत्या प्रकराचे स्वातंत्र्य आहे असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपाबाबत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट करण्यापूर्वी प्रथम आपल्या राज्यातील समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार विरोधी पक्षांवर खोटे आरोप करत आहे. राज्यात रोज विरोधी पक्षाच्या नेत्यांची हत्या होत आहे. राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या फोन कॉल्सवर नजर ठेवण्याची यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा