शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

ममता बॅनर्जी म्हणाल्या, " हे आर्थिक पॅकेज म्हणजे बिग झिरो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 20:06 IST

नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त आहे. 

ठळक मुद्दे "लोकांना आशा होती की, पंतप्रधान देशवासियांना काहीतरी देतील. मात्र, या लोकांना फसविले आहे, त्यांना काहीही मिळाले नाही."

कोलकाता : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजसंबंधी सविस्तर माहिती दिली. दरम्यान, या आर्थिक पॅकेजवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आर्थिक पॅकेजने जनतेची फसवणूक केली असून ते एक मोठा शून्य (बिग झिरो) असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "लोकांना आशा होती की, पंतप्रधान देशवासियांना काहीतरी देतील. मात्र, या लोकांना फसविले आहे, त्यांना काहीही मिळाले नाही."

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज लाजिरवाणे आहे. नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला हवे होते. या पॅकेजमध्ये राज्यांना काहीच मिळाले नाही. आमच्या राज्याचे अर्थमंत्री अमित मित्र यांनी सांगितले की, 20 लाख कोटींमधील दहा कोटींच्या योजना आधीपासूनच सुरु आहेत आणि राज्यांना काहीही मिळालेले नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 

केंद्र एक पालक संस्थेसारखे आहे आणि राज्य मुले आहेत. फक्त बोलणे आणि आयटी सेलची सेवा घेऊन काहीही होत नाही, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर केली आहे. त्या म्हणाल्या, "पालक मुलांचे संगोपन करतात. संघीय व्यवस्थेत केंद्र राज्यांचे पालक असतात, त्यांची जबाबदारी राज्यांची काळजी घेण्याची असते. मात्र, केंद्र फक्त भाजपाच्या सेल (आयटी सेल) ला सक्रिय करत आहे. ते खोट्या बातम्या पसरवत आहेत जेणेकरून जातीय दंगल पसरवता येईल."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी