शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

ममता बॅनर्जी म्हणाल्या, " हे आर्थिक पॅकेज म्हणजे बिग झिरो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 20:06 IST

नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त आहे. 

ठळक मुद्दे "लोकांना आशा होती की, पंतप्रधान देशवासियांना काहीतरी देतील. मात्र, या लोकांना फसविले आहे, त्यांना काहीही मिळाले नाही."

कोलकाता : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजसंबंधी सविस्तर माहिती दिली. दरम्यान, या आर्थिक पॅकेजवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आर्थिक पॅकेजने जनतेची फसवणूक केली असून ते एक मोठा शून्य (बिग झिरो) असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "लोकांना आशा होती की, पंतप्रधान देशवासियांना काहीतरी देतील. मात्र, या लोकांना फसविले आहे, त्यांना काहीही मिळाले नाही."

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज लाजिरवाणे आहे. नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला हवे होते. या पॅकेजमध्ये राज्यांना काहीच मिळाले नाही. आमच्या राज्याचे अर्थमंत्री अमित मित्र यांनी सांगितले की, 20 लाख कोटींमधील दहा कोटींच्या योजना आधीपासूनच सुरु आहेत आणि राज्यांना काहीही मिळालेले नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 

केंद्र एक पालक संस्थेसारखे आहे आणि राज्य मुले आहेत. फक्त बोलणे आणि आयटी सेलची सेवा घेऊन काहीही होत नाही, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर केली आहे. त्या म्हणाल्या, "पालक मुलांचे संगोपन करतात. संघीय व्यवस्थेत केंद्र राज्यांचे पालक असतात, त्यांची जबाबदारी राज्यांची काळजी घेण्याची असते. मात्र, केंद्र फक्त भाजपाच्या सेल (आयटी सेल) ला सक्रिय करत आहे. ते खोट्या बातम्या पसरवत आहेत जेणेकरून जातीय दंगल पसरवता येईल."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी