शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

ममता बॅनर्जी म्हणाल्या, " हे आर्थिक पॅकेज म्हणजे बिग झिरो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 20:06 IST

नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त आहे. 

ठळक मुद्दे "लोकांना आशा होती की, पंतप्रधान देशवासियांना काहीतरी देतील. मात्र, या लोकांना फसविले आहे, त्यांना काहीही मिळाले नाही."

कोलकाता : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजसंबंधी सविस्तर माहिती दिली. दरम्यान, या आर्थिक पॅकेजवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आर्थिक पॅकेजने जनतेची फसवणूक केली असून ते एक मोठा शून्य (बिग झिरो) असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "लोकांना आशा होती की, पंतप्रधान देशवासियांना काहीतरी देतील. मात्र, या लोकांना फसविले आहे, त्यांना काहीही मिळाले नाही."

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज लाजिरवाणे आहे. नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला हवे होते. या पॅकेजमध्ये राज्यांना काहीच मिळाले नाही. आमच्या राज्याचे अर्थमंत्री अमित मित्र यांनी सांगितले की, 20 लाख कोटींमधील दहा कोटींच्या योजना आधीपासूनच सुरु आहेत आणि राज्यांना काहीही मिळालेले नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 

केंद्र एक पालक संस्थेसारखे आहे आणि राज्य मुले आहेत. फक्त बोलणे आणि आयटी सेलची सेवा घेऊन काहीही होत नाही, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर केली आहे. त्या म्हणाल्या, "पालक मुलांचे संगोपन करतात. संघीय व्यवस्थेत केंद्र राज्यांचे पालक असतात, त्यांची जबाबदारी राज्यांची काळजी घेण्याची असते. मात्र, केंद्र फक्त भाजपाच्या सेल (आयटी सेल) ला सक्रिय करत आहे. ते खोट्या बातम्या पसरवत आहेत जेणेकरून जातीय दंगल पसरवता येईल."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी