शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

भाजपाच्या धक्क्यानंतर ममतांच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 10:55 IST

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार आणि 50 नगरसेवक काल भाजपात सामील झाल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. या धक्क्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये फेरबदल केला आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला परिणाम लक्षात घेता ममता बॅनर्जी यांनी कॅबिनेटमध्ये फेरबदल केल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला उत्तर बंगाल आणि जंगलमहल परिसरात यश मिळवता आले नाही. यातच, या भागातून निवडून येणारे विनोय कृष्णा वर्मन आणि शांतिराम महतो यांच्याकडून मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. तर सुब्रता मुखर्जी, शुभेंदु अधिकारी, राजीव बॅनर्जी आणि ब्रात्या बसू यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.  

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे. ते म्हणाले,'पश्चिम बंगालमध्ये सहा महिने ते एक वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होतील. सध्याचे सरकार 2021 पर्यंत टिकणार नाही. तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार पोलीस आणि सीआयडीच्या दबावाखाली चालत आहे.' 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपाने ममता बॅनर्जींना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय खेळी सुरु केली असून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पार्टीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 

ममता बनर्जी यांच्या जवळचे नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपाने सुरु केला आहे. तर, कालच तृणमूल काँग्रेसचे आमदार सुभ्रांशु रॉय, तुष्क्रांति भट्टाचार्य यांच्यासह 50 नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर सीपीएमचे आमदार विधायर देवेंद्र रॉय सुद्धा भाजपात सामील झाले आहेत.   

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019west bengalपश्चिम बंगालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९