शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

Yaas चक्रीवादळ: बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जींचा नकार; अधिकारींना निमंत्रण दिल्याने नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 14:42 IST

Yass Cyclone: बैठकीला उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकाल दिला आहे.

ठळक मुद्देचक्रीवादळ आढावा बैठकीत उपस्थित राहण्यास ममता बॅनर्जींचा नकारपंतप्रधान मोदींसोबत आढावा बैठकसुवेंदू अधिकारी यांना बोलावल्याने नाराजी

कोलकाता: पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर लगेचच पूर्व किनारपट्टीला यास या चक्रीवादळाने (Yass Cyclone) तडाखा दिला. ओडिसा, पश्चिम बंगालसह अन्य राज्यांतही यास चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीचे हवाई सर्वेक्षण केले. तसेच राज्यांत झालेले नुकसान आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकही घेत आहेत. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकाल दिला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनाही या बैठकीसाठी निमंत्रित केल्याने ममता बॅनर्जी नाराज झाल्याचे समजते. (mamata banerjee refused to attend meeting with pm modi over yaas cyclone)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कालीकुंडा येथील आढावा बैठकीमध्ये सहभागी होण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. कालीकुंडा येथील बैठकीत यास चक्रीवादळात झालेले नुकसान आणि अन्य माहितीची कागपत्रे घेऊन ममता बॅनर्जी जाणार असल्याचे समजते. ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयामुळे राज्य आणि केंद्रातील तणाव वाढू शकतो, अशी चर्चा आहे. 

“हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका

पंतप्रधान मोदींकडून आढावा

यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरील आढावा बैठकीत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रीयमंत्री आणि बंगालमधून खासदार असलेले देबाश्री चौधरी, केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित राहणार आहेत. यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यातील भागांचे मोठे नुकसान झाले आहे. 

नवे नियम सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठीच, युझर्सनी घाबरू नये: रविशंकर प्रसाद

पश्चिम बंगालमध्ये ३ लाख घरांचे नुकसान

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एक कोटी जनता प्रभावित झाल्याचे म्हटले आहे. १५ लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, ३ लाख घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.   

टॅग्स :cycloneचक्रीवादळMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीOdishaओदिशाPoliticsराजकारण