शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

"ममता बॅनर्जी या बंगालच्या किम जोंग उन", गिरीराज सिंहांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:11 IST

Giriraj Singh on Mamata Banerjee : गिरीराज सिंह यांनी ममता  बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली.

Giriraj Singh on Mamata Banerjee : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. यावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गिरीराज सिंह यांनी ममता  बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली. ज्याप्रमाणे किम जोंग विरोधकांना सहन करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरोध सहन करू शकत नाहीत, असे गिरिराज सिंह म्हणाले.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून बंगाल सरकारवर हल्लाबोल करताना गिरिराज सिंह म्हणाले, आज जे लोक अत्याचार झालेल्या मुलीसोबत बंगालमध्ये दिसत नाहीत. पण, ते तुकडे तुकडे गँग ममता बॅनर्जी यांच्यासोबत दिसत आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरल्या आहेत आणि त्यांनी आपली लोकप्रियता गमावली आहे. त्यामुळेच त्या असंवैधानिक गोष्टी बोलत आहेत. फेडरल स्ट्रक्चर तोडत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी आणि लालू यादव उभे आहेत, असे गिरिराज सिंह यांनी सांगितले. 

याचबरोबर, गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जींच्या विधानावरही आक्षेप घेतला. त्यांनी ज्या पद्धतीने विधान केले आहे, ते लोकशाहीवादी व्यक्तीचे असू शकत नाही. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्याने त्यांची वागणूक उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासारखीच आहे. किम जोंग उन यांना विरोधी पक्ष जसा आवडत नाही, तसाच ममता बॅनर्जी यांनाही विरोधी पक्ष आवडत नाही, असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. नुकतेच एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, "लक्षात ठेवा, बंगाल जळला तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीतही जाळपोळ होईल". ममता बॅनर्जींच्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.

ममता बॅनर्जींच्या या विधानावर भाजप नेते सुकांत मजुमदार यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. पत्रात सुकांत मजुमदार यांनी पश्चिम बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानामुळे राज्यात अशांतता निर्माण होण्याची भीती सुकांत मजुमदार व्यक्त केली आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा