शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

"ममता बॅनर्जी या बंगालच्या किम जोंग उन", गिरीराज सिंहांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:11 IST

Giriraj Singh on Mamata Banerjee : गिरीराज सिंह यांनी ममता  बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली.

Giriraj Singh on Mamata Banerjee : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. यावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गिरीराज सिंह यांनी ममता  बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली. ज्याप्रमाणे किम जोंग विरोधकांना सहन करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरोध सहन करू शकत नाहीत, असे गिरिराज सिंह म्हणाले.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून बंगाल सरकारवर हल्लाबोल करताना गिरिराज सिंह म्हणाले, आज जे लोक अत्याचार झालेल्या मुलीसोबत बंगालमध्ये दिसत नाहीत. पण, ते तुकडे तुकडे गँग ममता बॅनर्जी यांच्यासोबत दिसत आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरल्या आहेत आणि त्यांनी आपली लोकप्रियता गमावली आहे. त्यामुळेच त्या असंवैधानिक गोष्टी बोलत आहेत. फेडरल स्ट्रक्चर तोडत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी आणि लालू यादव उभे आहेत, असे गिरिराज सिंह यांनी सांगितले. 

याचबरोबर, गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जींच्या विधानावरही आक्षेप घेतला. त्यांनी ज्या पद्धतीने विधान केले आहे, ते लोकशाहीवादी व्यक्तीचे असू शकत नाही. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्याने त्यांची वागणूक उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासारखीच आहे. किम जोंग उन यांना विरोधी पक्ष जसा आवडत नाही, तसाच ममता बॅनर्जी यांनाही विरोधी पक्ष आवडत नाही, असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. नुकतेच एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, "लक्षात ठेवा, बंगाल जळला तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीतही जाळपोळ होईल". ममता बॅनर्जींच्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.

ममता बॅनर्जींच्या या विधानावर भाजप नेते सुकांत मजुमदार यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. पत्रात सुकांत मजुमदार यांनी पश्चिम बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानामुळे राज्यात अशांतता निर्माण होण्याची भीती सुकांत मजुमदार व्यक्त केली आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा