शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

"ममता बॅनर्जी या बंगालच्या किम जोंग उन", गिरीराज सिंहांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:11 IST

Giriraj Singh on Mamata Banerjee : गिरीराज सिंह यांनी ममता  बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली.

Giriraj Singh on Mamata Banerjee : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. यावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गिरीराज सिंह यांनी ममता  बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली. ज्याप्रमाणे किम जोंग विरोधकांना सहन करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरोध सहन करू शकत नाहीत, असे गिरिराज सिंह म्हणाले.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून बंगाल सरकारवर हल्लाबोल करताना गिरिराज सिंह म्हणाले, आज जे लोक अत्याचार झालेल्या मुलीसोबत बंगालमध्ये दिसत नाहीत. पण, ते तुकडे तुकडे गँग ममता बॅनर्जी यांच्यासोबत दिसत आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरल्या आहेत आणि त्यांनी आपली लोकप्रियता गमावली आहे. त्यामुळेच त्या असंवैधानिक गोष्टी बोलत आहेत. फेडरल स्ट्रक्चर तोडत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी आणि लालू यादव उभे आहेत, असे गिरिराज सिंह यांनी सांगितले. 

याचबरोबर, गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जींच्या विधानावरही आक्षेप घेतला. त्यांनी ज्या पद्धतीने विधान केले आहे, ते लोकशाहीवादी व्यक्तीचे असू शकत नाही. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्याने त्यांची वागणूक उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासारखीच आहे. किम जोंग उन यांना विरोधी पक्ष जसा आवडत नाही, तसाच ममता बॅनर्जी यांनाही विरोधी पक्ष आवडत नाही, असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. नुकतेच एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, "लक्षात ठेवा, बंगाल जळला तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीतही जाळपोळ होईल". ममता बॅनर्जींच्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.

ममता बॅनर्जींच्या या विधानावर भाजप नेते सुकांत मजुमदार यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. पत्रात सुकांत मजुमदार यांनी पश्चिम बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानामुळे राज्यात अशांतता निर्माण होण्याची भीती सुकांत मजुमदार व्यक्त केली आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा