शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेमुळं ममता बॅनर्जींचा उत्साह वाढणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:00 IST

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जवळ आली असून येथे लढत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्येच होणार आहे. 

मुंबई - बलाढ्य भाजपला शह देणे देशातील कोणत्याही नेत्याला वा पक्षाला शक्य नाही, असं चित्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालं आहे. त्यामुळे भाजपसोबत किंवा भाजपला समांतर भूमिका घेण्यावर नेत्यांचा कल दिसून येतो. मात्र महाराष्ट्रात याउलट झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रखर झुंज देत भाजपची सत्ता उलथून टाकली आहे. यामुळे भाजपशी दोन हात करत असलेल्या ममता बॅनर्जी यांना बळ मिळाले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपकडून ममता यांना सतत टार्गेट करण्यात येत असून त्यांची प्रतिमा खराब कऱण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. परंतु, ममता दीदी देखील पाय रोवून भाजपचे आक्रमण रोखून धरत आहेत. 

महाराष्ट्रातही भाजपला शह देण्यासाठी शरद पवारांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. शिवसेनेला आपल्या सोबत घेऊन भाजपला रोखण्याची योजना पवारांची होती. मात्र त्यांच्या योजनेला त्यांचेच पुतणे अजित पवार हे सुरंग लावण्याच्या तयारीत होते. मात्र न्यायालय आणि मित्र पक्षांच्या विश्वासाच्या जोरावर शरद पवार यांनी भाजपला शह देण्यात यश मिळवले. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. 

बलाढ्य असलं तरी भाजपला शह देता येतो हा संदेश शरद पवार यांनी देशाला दिला. महाराष्ट्रात विरोधकांचा झालेला विजय ममता दीदींना बळ देणारा ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जवळ आली असून येथे लढत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्येच होणार आहे.