शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेमुळं ममता बॅनर्जींचा उत्साह वाढणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:00 IST

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जवळ आली असून येथे लढत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्येच होणार आहे. 

मुंबई - बलाढ्य भाजपला शह देणे देशातील कोणत्याही नेत्याला वा पक्षाला शक्य नाही, असं चित्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालं आहे. त्यामुळे भाजपसोबत किंवा भाजपला समांतर भूमिका घेण्यावर नेत्यांचा कल दिसून येतो. मात्र महाराष्ट्रात याउलट झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रखर झुंज देत भाजपची सत्ता उलथून टाकली आहे. यामुळे भाजपशी दोन हात करत असलेल्या ममता बॅनर्जी यांना बळ मिळाले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपकडून ममता यांना सतत टार्गेट करण्यात येत असून त्यांची प्रतिमा खराब कऱण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. परंतु, ममता दीदी देखील पाय रोवून भाजपचे आक्रमण रोखून धरत आहेत. 

महाराष्ट्रातही भाजपला शह देण्यासाठी शरद पवारांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. शिवसेनेला आपल्या सोबत घेऊन भाजपला रोखण्याची योजना पवारांची होती. मात्र त्यांच्या योजनेला त्यांचेच पुतणे अजित पवार हे सुरंग लावण्याच्या तयारीत होते. मात्र न्यायालय आणि मित्र पक्षांच्या विश्वासाच्या जोरावर शरद पवार यांनी भाजपला शह देण्यात यश मिळवले. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. 

बलाढ्य असलं तरी भाजपला शह देता येतो हा संदेश शरद पवार यांनी देशाला दिला. महाराष्ट्रात विरोधकांचा झालेला विजय ममता दीदींना बळ देणारा ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जवळ आली असून येथे लढत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्येच होणार आहे.