शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेमुळं ममता बॅनर्जींचा उत्साह वाढणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:00 IST

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जवळ आली असून येथे लढत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्येच होणार आहे. 

मुंबई - बलाढ्य भाजपला शह देणे देशातील कोणत्याही नेत्याला वा पक्षाला शक्य नाही, असं चित्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालं आहे. त्यामुळे भाजपसोबत किंवा भाजपला समांतर भूमिका घेण्यावर नेत्यांचा कल दिसून येतो. मात्र महाराष्ट्रात याउलट झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रखर झुंज देत भाजपची सत्ता उलथून टाकली आहे. यामुळे भाजपशी दोन हात करत असलेल्या ममता बॅनर्जी यांना बळ मिळाले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपकडून ममता यांना सतत टार्गेट करण्यात येत असून त्यांची प्रतिमा खराब कऱण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. परंतु, ममता दीदी देखील पाय रोवून भाजपचे आक्रमण रोखून धरत आहेत. 

महाराष्ट्रातही भाजपला शह देण्यासाठी शरद पवारांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. शिवसेनेला आपल्या सोबत घेऊन भाजपला रोखण्याची योजना पवारांची होती. मात्र त्यांच्या योजनेला त्यांचेच पुतणे अजित पवार हे सुरंग लावण्याच्या तयारीत होते. मात्र न्यायालय आणि मित्र पक्षांच्या विश्वासाच्या जोरावर शरद पवार यांनी भाजपला शह देण्यात यश मिळवले. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. 

बलाढ्य असलं तरी भाजपला शह देता येतो हा संदेश शरद पवार यांनी देशाला दिला. महाराष्ट्रात विरोधकांचा झालेला विजय ममता दीदींना बळ देणारा ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जवळ आली असून येथे लढत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्येच होणार आहे.