शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात; ममता बॅनर्जींचे थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 16:23 IST

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिकाधिक तापत असल्याचे दिसून येत आहे. या रणधुमाळीत आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे निवडणुकीचे बिगूल वाजवले असून, भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शनबीरभूम येथील पदयात्रेनंतरच्या संबोधनात भाजपवर जोरदार निशाणाभाजपने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात; दिले थेट आव्हान

बीरभूम :पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिकाधिक तापत असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) एकमेकांविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या रणधुमाळीत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे निवडणुकीचे बिगूल वाजवले असून, भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे पदयात्रा काढली. या पदयात्रेत हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर उपस्थितांना केलेल्या संबोधनात पश्चिम बंगालमध्ये भाजपने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात आणि त्यानंतर २९४ जागांचे स्वप्न पाहावे, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिले. 

विधानसभा निवडणुकीचा कालावधी जवळ येतोय, तसे भाजप नेते दर आठवड्याला येथे येऊन मुक्काम करत आहेत. मात्र, आम्ही ३६५ दिवस पश्चिम बंगालमध्येच असतो. भाजप नेते फाइव्ह स्टार हॉटेलचे जेवण जेवतात आणि आदिवासी समाजासोबत जेवण करत असल्याचा आभास निर्माण करत बंगालच्या जनतेची भाजपकडून दिशाभूल केली जात असल्याची जोरदार टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली. 

केंद्रीय तपास संस्था आणि सरकारी पैशांचा वापर करून भाजप पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे, तर बनावट व्हिडिओ तयार करून समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. पश्चिम बंगालमधील निवडणुकीवेळी भाजप नेत्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आठवण झाली आहे. विश्व भारती विद्यापीठात भाजपकडून केवळ राजकारण केले जात आहे. बंगालमध्ये द्वेषाचे राजकारण करत बंगालची संस्कृती संपवण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप बॅनर्जी यांनी केला. 

केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या कृषी कायद्यावरही ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला. काही आमदार खरेदी केल्याने तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडेल, असा कयास भाजप करत आहे. मात्र, असे काहीही होणार नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी नमूद केले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी रोड शो केला होता. त्याच ठिकाणी पदयात्रा काढत ममता बॅनर्जी यांनी शक्तिप्रदर्शन केल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाtmcठाणे महापालिका