शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईच्या दौऱ्यावर! शरद पवारांना भेटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 04:30 IST

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्यावरून उलटसुल चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईत येत आहेत. ते त्यावेळी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्यावरून उलटसुल चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईत येत आहेत. ते त्यावेळी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.ते काँग्रेसच्या राज्यातील सर्व नेत्यांशी चर्चा करतील. दिल्लीत शनिवारी खरगे यांनी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना बोलावून घेतले होते. या बैठकीत काँग्रेसच्या राज्यातील स्थितीविषयी चर्चा झाली. महाराष्ट्रात पक्ष मजबूत नसल्याबद्दल खरगे यांनी नाराजी व्यक्त केली आणि २0१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी नेत्यांनी संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्ता पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचना दिल्या.या बैठकीत काही नेत्यांनी आपली गाºहाणी तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य आघाडीबाबतची मते खरगे यांना ऐकवली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली, पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आपण राज्याचा दौरा करून व सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकूनच योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.या बैठकीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, तसेच हर्षवर्धन पाटील, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, राजीव सातव, नितीन राऊत आदी नेते उपस्थित होते.भाजपाविरोधी आघाडी होणे सोपे नाहीदेशातील सर्व राज्यांमध्ये भाजपाविरोधी पक्षांची आघाडी होणे वाटते इतके सोपे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.एका मुलाखतीत ते म्हणाले की, माझ्या अनेक सहकाºयांना भाजपाविरोधी आघाडी होणे गरजेचे आहे, असे वाटते. पण माझ्या मते ते सोपे नाही.ती करण्यात असंख्य अडचणी आहेत.त्यामुळे आघाडीचा पंतप्रधानपदाचाउमेदवार कोण हीचर्चाही अर्थहीन आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र