शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Mallikarjun Kharge: 'जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिला', अदनींच्या मुद्द्यावरुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 16:05 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गौतम अदानींचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adnai) यांना मदत केल्याचा आणि सत्तेत आल्यापासून खऱ्या मुद्द्यांवर न बोलून लोकशाही नष्ट केल्याचा आरोप केला. झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात एका रॅलीमध्ये ते बोलत होते. 

यावेळी खर्गे म्हणाले, '2019 मध्ये गौतम अदानींची मालमत्ता 1 लाख कोटी रुपये होती. अडीच वर्षांत त्यांची संपत्ती 13 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली. हे तेच अदानी होते, ज्यांच्या फ्लाइटने मोदी शपथ घेण्यासाठी आले होते. अशी कोणती जादूची कांडी आहे, ज्याने अदानींची संपत्ती एवढी वाढवली? मोदींनी जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिल्याने हे घडले', असा आरोप खर्गेंनी केला.

काँग्रेस अध्यक्ष पुढे म्हणाले, 'मी मोदीजींना विनंती करेन की, देशातील गरीब, शेतकरी आणि मजुरांना ही कला शिकवावी. मग तुम्हाला इतके कष्ट करावे लागणार नाहीत. तुम्ही अदानींना 13 लाख कोटी रुपयांची मदत केली, देशातील लोकांना किमान 13 लाखांची मदत करा.' यावेळी भाजप सरकार लोकशाही नष्ट करत असल्याचा आरोप करत खर्गे म्हणाले की, 'माझ्या सभागृहातील भाषणासोबतच राहुल गांधींच्या भाषणाचा काही भागही हटवण्यात आला. काँग्रेस पक्षाने खरे मुद्दे मांडण्याचे काम केले. माझी कविताही काढली. त्यात असंसदीय काय होतं?... मोदीजींनी काही कविताही वाचल्या होत्या, पण त्या काढल्या नाहीत,' असंही खर्गे म्हणाले.

'लोकशाहीवर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही'झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, 'मोठ्या आणि जुन्या पक्षाला लोकशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसने निवडून आलेल्या बिगर काँग्रेस सरकारांना बरखास्त करण्यासाठी कायद्यांचा वापर केला. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी एकाच दिवसात राज्यातील भाजपची तीन सरकारे पाडली. ज्या पक्षाने आणीबाणी लादली, त्यांना लोकशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.'

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीGautam Adaniगौतम अदानी