शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी माळशिरस तालुका : हनुमंत डोळस यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

अकलूज : सततचा दुष्काळ आणि पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरी माळशिरस तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. या टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मंजूर करावेत अशा मागणीचे निवेदन आ.हनुमंत डोळस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

अकलूज : सततचा दुष्काळ आणि पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरी माळशिरस तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. या टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मंजूर करावेत अशा मागणीचे निवेदन आ.हनुमंत डोळस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
आ.डोळस यांनी दि.३१ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना माळशिरस तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशा मागणीचे निवेदन दिले आहे. या निवेदनात आ.डोळस यांनी माळशिरस तालुक्यातील कोथळे, लोंढे-मोहितेवाडी, लोणंद, डोंगरवाडी, गिरवी, तरंगफळ, जळभावी, गारवाड, मगरवाडी, रेडे, भांब, पठाणवस्ती, सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी, काळमवाडी, बोरगाव, माळखांबी, उघडेवाडी, दसूर आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.
तालुक्यातील पश्चिम भागातील काही गावांमध्ये गेल्या ३-४ वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर इतर गावांचे टँकरचे प्रस्ताव तालुका प्रशासनाने जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे दाखल केले आहेत, परंतु जिल्हा प्रशासनाकडून याबाबत गंभीरपणे दखल घेतली जात नाही. या गावातील नागरिकांचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. पूर्व भागातील शेंडेचिंच, धानोरे, मळोली, साळमुख या गावातही सध्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.
टंचाईग्रस्त गावातील नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. विहिरी, विंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांबरोबरच जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. या गावांना त्वरित टँकर मंजूर करावेत व संबंधित अधिकार्‍यांना आदेश द्यावेत अशी मागणीही आ.डोळस यांनी केली आहे.