पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी माळशिरस तालुका : हनुमंत डोळस यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
अकलूज : सततचा दुष्काळ आणि पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरी माळशिरस तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. या टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मंजूर करावेत अशा मागणीचे निवेदन आ.हनुमंत डोळस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी माळशिरस तालुका : हनुमंत डोळस यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
अकलूज : सततचा दुष्काळ आणि पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरी माळशिरस तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. या टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मंजूर करावेत अशा मागणीचे निवेदन आ.हनुमंत डोळस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.आ.डोळस यांनी दि.३१ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना माळशिरस तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशा मागणीचे निवेदन दिले आहे. या निवेदनात आ.डोळस यांनी माळशिरस तालुक्यातील कोथळे, लोंढे-मोहितेवाडी, लोणंद, डोंगरवाडी, गिरवी, तरंगफळ, जळभावी, गारवाड, मगरवाडी, रेडे, भांब, पठाणवस्ती, सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी, काळमवाडी, बोरगाव, माळखांबी, उघडेवाडी, दसूर आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.तालुक्यातील पश्चिम भागातील काही गावांमध्ये गेल्या ३-४ वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर इतर गावांचे टँकरचे प्रस्ताव तालुका प्रशासनाने जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे दाखल केले आहेत, परंतु जिल्हा प्रशासनाकडून याबाबत गंभीरपणे दखल घेतली जात नाही. या गावातील नागरिकांचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. पूर्व भागातील शेंडेचिंच, धानोरे, मळोली, साळमुख या गावातही सध्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.टंचाईग्रस्त गावातील नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. विहिरी, विंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांबरोबरच जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. या गावांना त्वरित टँकर मंजूर करावेत व संबंधित अधिकार्यांना आदेश द्यावेत अशी मागणीही आ.डोळस यांनी केली आहे.