शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

मलिक म्हणाले, ‘ते माझे वैयक्तिक मत’ वादग्रस्त विधानानंतर घुमजाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 03:04 IST

वादग्रस्त वक्तव्यावरील गदारोळानंतर विधान योग्य नसल्याची कबुली

श्रीनगर : काश्मीरला लुटणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारले पाहिजे, असे विधान राज्यपाल या पदावरील व्यक्तीने करणे योग्य नाही; पण संताप, उद्वेगातून मी ते केले. ते माझे वैयक्तिक मत आहे, असा खुलासा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सोमवारी केला.

एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या विधानामुळे गदारोळ माजल्यानंतर दुसºया दिवशी आपली भूमिका सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये अनेक राजकीय नेते, नोकरशहा हे कमालीचे भ्रष्ट आहेत. ते गुन्हेगार आहेत. त्यांच्याविषयी संताप व्यक्त करताना राज्यपाल म्हणून मी संयमाने बोलणे आवश्यक होते. मात्र, एक व्यक्ती म्हणून विचाराल, तर मी जे बोललो तेच माझे खरे मत आहे.

कारगिल लडाख पर्यटन महोत्सवाचे उद््घाटन सत्यपाल मलिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या दहशतवादी युवकांनी हातात बंदुका घेतल्या आहेत ते निरपराध लोकांना, पोलीस अधिकाऱ्यांना मारतात. तुम्ही या लोकांना का मारत आहात? अशांना मारा ज्यांनी तुमच्या काश्मीरची सारी दौलत लुटली आहे. या भ्रष्टाचारी लोकांपैकी एकाला तरी कधी तुम्ही मारले आहे का?

काश्मीरमध्ये आजवर ज्या घराण्यांनी सत्ता उपभोगली त्यांच्याकडे अमर्याद संपत्ती आहे. त्यांचे काश्मीरमध्ये एक घर आहे तर दिल्ली, दुबई व लंडनमध्येही त्यांनी घरे विकत घेतली आहेत. काश्मीरमध्ये पूर्वी मंत्रीपद उपभोगलेल्यांपैकी दोन-तीन महत्त्वाच्या व्यक्ती जामिनासाठी येत्या दोन-तीन महिन्यांत धावपळ करताना दिसतील. त्यावेळेला तुम्ही माझी तारीफच कराल. काश्मीरमधील राजकारणी दुतोंडी आहेत. दिल्लीमध्ये ते आमच्याशी हसतखेळत चर्चा करतात. काश्मीरमध्ये मात्र जनतेची माथी भडकवितात, असा आरोपही त्यांनी केला. 

हे आवाहन भयावहसत्यपाल मलिक यांच्यावर टीका करताना काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, राजकारणी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांना ठार मारण्याचे आवाहन राज्यपालांनी दहशतवाद्यांना करणे भयावह आहे.बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी दुसºयांना प्रोत्साहन देणाºयांनी स्वत:ची प्रतिमा दिल्लीत कशी आहे, हे आधी तपासून पाहावे. त्यावर ओमर अब्दुल्ला हे बालिश राजकारणी असल्याचा टोला सत्यपाल मलिक यांनी लगावला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर