शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

भारताला 'पॉवर'फुल्ल झटका; मोदींचा मैत्रीचा हात झटकत मालदीवची पाकिस्तानला साथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 12:38 IST

फेब्रुवारी महिन्यात मालदीवमध्ये राजकीय संकट उद्भवलं होतं. तेव्हापासूनच, मालदीव सरकार भारताला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे.

नवी दिल्लीः चीन आणि पाकिस्तान या दोन त्रासदायक शेजाऱ्यांशी लढण्यासाठी मालदीवची मदत घेण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मोठा हादरा बसला आहे. भारतीयांना 'वर्क परमिट' देणं बंद करणाऱ्या, भारतानं दिलेली हेलिकॉप्टर परत करून टाकणाऱ्या मालदीव सरकारने पाकिस्तानसोबत ऊर्जाविषयक करार करून मैत्रीचं नवं पर्वच सुरू केलंय. त्यांचं हे 'पॉवर कनेक्शन' मोदी सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतं. 

फेब्रुवारी महिन्यात मालदीवमध्ये राजकीय संकट उद्भवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राजकीय कैद्यांची सुटका करण्यास राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी नकार दिला होता. उलट, १५ दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. तेव्हापासूनच, मालदीव सरकार भारताला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. याउलट, ते चीन आणि पाकिस्तानसोबत हातमिळवणी करताना दिसताहेत. मालदीव सरकारच्या स्टेलको विद्युत कंपनीचे अधिकारी गेल्या आठवड्यात पाकिस्तानात गेले होते. तिथे त्यांनी ऊर्जाविषयक सामंजस्य करार केल्याचं समजतं. 

भारताच्या सहकार्याने सुरू असलेले प्रकल्प मालदीव सरकार मुद्दाम रखडवतंय. पण दुसरीकडे, चीनचे अनेक मोठे प्रकल्प मालदीवमध्ये वेगाने सुरू आहेत. भारतीयांना 'वर्क परमिट' न देण्याचा निर्णयही अब्दुल्ला यामीन सरकारने गेल्या महिन्यात घेतला होता. त्याशिवाय, भारताने भेट म्हणून पाठवलेली हेलिकॉप्टर घेण्यासही त्यांनी नकार दिला होता. मालदीवमधून भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी ही खेळी सुरू असल्याचं मत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं मांडलं. स्टेलकोचे अनेक प्रकल्प चीनच्या सहकार्याने सुरू आहेत.  पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांच्याकडून मालदीवला फारशी मदतही मिळू शकत नाही. तरीही, पाकशी करार करून त्यांनी भारत सरकारला सूचक इशारा दिला आहे, याकडेही या अधिकाऱ्यानं लक्ष वेधलं.  

मालदीवमधील राजकीय संकटाच्या वेळी, माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी भारताला लष्करी मदत पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला चीनने विरोध केला होता. मालदीवमध्ये कोणत्याही देशाचा लष्करी हस्तक्षेप नको, अशी भूमिका 'ड्रॅगन'ने घेतली होती. तेव्हापासूनच अब्दुल्ला यामीन यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचं जाणकारांनी नमूद केलं.    

टॅग्स :MaldivesमालदीवNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनPakistanपाकिस्तान