शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 06:55 IST

आधी ही मर्यादा १२० दिवसांची होती. नवीन व्यवस्था १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होईल.

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने आसनांचा ‘आगाऊ आरक्षण कालावधी’ (एआरपी) १२० दिवसांवरून घटवून ६० दिवस केला आहे. म्हणजेच आता प्रवासाच्या केवळ ६० दिवस आधी रेल्वे आसनाचे आरक्षण करता येऊ शकेल. आधी ही मर्यादा १२० दिवसांची होती. नवीन व्यवस्था १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होईल.

रेल्वे बोर्डाने १६ ऑक्टोबर रोजी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २०२४ पासून आगाऊ आरक्षणाची कालमर्यादा १२० दिवसांवरून घटवून ६० दिवस (प्रवासाची तारीख सोडून) करण्यात आली आहे. या निर्णयामागील कोणतेही कारण या परिपत्रकात देण्यात आलेले नाही. 

ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस यांसारख्या दिवसा चालणाऱ्या काही रेल्वेच्या कालमर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कारण त्यांची कालमर्यादा आधीच कमी आहे. विदेशी पर्यटकांसाठी असलेल्या ३६५ दिवसांच्या कालमर्यादेतही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. 

आधी किती होता कालावधी?- आधी एआरपी कालावधी ६० दिवसांचाच होता. २०१५मध्ये तो वाढवून १२० दिवसांचा केला होता.- ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेली १२० दिवसांची आगाऊ आरक्षणे वैध असतील. तसेच ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे बुकिंग रद्द करण्याचीही अनुमती असेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpassengerप्रवासी