शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 06:55 IST

आधी ही मर्यादा १२० दिवसांची होती. नवीन व्यवस्था १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होईल.

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने आसनांचा ‘आगाऊ आरक्षण कालावधी’ (एआरपी) १२० दिवसांवरून घटवून ६० दिवस केला आहे. म्हणजेच आता प्रवासाच्या केवळ ६० दिवस आधी रेल्वे आसनाचे आरक्षण करता येऊ शकेल. आधी ही मर्यादा १२० दिवसांची होती. नवीन व्यवस्था १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होईल.

रेल्वे बोर्डाने १६ ऑक्टोबर रोजी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २०२४ पासून आगाऊ आरक्षणाची कालमर्यादा १२० दिवसांवरून घटवून ६० दिवस (प्रवासाची तारीख सोडून) करण्यात आली आहे. या निर्णयामागील कोणतेही कारण या परिपत्रकात देण्यात आलेले नाही. 

ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस यांसारख्या दिवसा चालणाऱ्या काही रेल्वेच्या कालमर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कारण त्यांची कालमर्यादा आधीच कमी आहे. विदेशी पर्यटकांसाठी असलेल्या ३६५ दिवसांच्या कालमर्यादेतही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. 

आधी किती होता कालावधी?- आधी एआरपी कालावधी ६० दिवसांचाच होता. २०१५मध्ये तो वाढवून १२० दिवसांचा केला होता.- ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेली १२० दिवसांची आगाऊ आरक्षणे वैध असतील. तसेच ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे बुकिंग रद्द करण्याचीही अनुमती असेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpassengerप्रवासी