शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

राममंदिर उभारणीसाठीे समझोता घडवून आणू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:31 IST

राममंदिराच्या उभारणीसाठी त्याच्याशी संबंधित सर्व बाजूच्या लोकांमध्ये समझोता घडवून आणण्याला भाजपाने प्राधान्य दिले असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी गुरुवारी सांगितले.

अयोध्या : राममंदिराच्या उभारणीसाठी त्याच्याशी संबंधित सर्व बाजूच्या लोकांमध्ये समझोता घडवून आणण्याला भाजपाने प्राधान्य दिले असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी गुरुवारी सांगितले.ते म्हणाले की, अयोध्येमध्ये राममंदिर उभारावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास भाजपा त्याची अंमलबजावणी करील किंवा या प्रश्नाशी संबंधित सर्व पक्षकारांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न करू. जर सारे पर्याय संपले, तर संसदीय मार्गांचा अवलंब करून तोडगा काढला जाऊ शकतो. बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू उद््ध्वस्त केली हा वादविवादाचा विषय होऊच शकत नाही. कारसेवकांनी केलेली कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. रामजन्मभूमीसाठी विश्व हिंदू परिषदेने आजवर जो लढा दिला आहे तो देशातील जनतेला ज्ञात आहे.मौैर्य यांनी सांगितले की, रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी गोळीबारात ठार झालेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. कुटुंबियांना मदत करण्यासंदर्भातील प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. रामभक्तांच्या मनात मुस्लिमांविषयी द्वेष नाही. आमचे विरोधक मुस्लिमांचे लांगुलचालन करून सलोख्याचे वातावरण बिघडवत असतात.>उद्धव ठाकरेंना टोलारामजन्मभूमीत रामलल्लांना एखाद्या तुरुंगात ठेवल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया तिथे दर्शन घेऊन आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यावर टीका करताना मौर्य म्हणाले की, रामलल्ला हे अनादी व अनंत असून त्यांना कोणीही तुरुंगात डांबणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप निरर्थक आहेत. राममंदिर बांधू इच्छिणाऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर