शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कृषी कायद्यावरील रिपोर्ट सार्वजनिक करा; अनिल घनवट यांचं मुख्य न्यायाधीशांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 19:50 IST

कृषी सुधारणेची मागणी करत पुढील काही महिन्यात १ लाख शेतकऱ्यांना घेऊन दिल्ली गाठणार आहे असंही अनिल घनवट यांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाला अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने पूर्णविराम मिळाला. परंतु या कायद्यावरून अद्यापही चर्चा सुरु आहे. कृषी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने त्रिसदस्यीय पॅनेलची स्थापना केली होती. त्यातील अनिल घनवट यांनी मंगळवारी कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एनवी रमण यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कृषी कायद्याबाबत आणलेला रिपोर्ट लवकरात लवकर सार्वजनिक करण्याचा अथवा समितीला लोकांसमोर आणण्याबाबत निर्देश द्यावेत असं म्हटलं आहे.

अनिल घनवट यांनी पत्रात लिहिलंय की, केंद्र सरकारकडून येत्या हिवाळी अधिवेशनात तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या रिपोर्टची काही आवश्यकता नाही. परंतु या रिपोर्टमध्ये ज्या काही शिफारशी आहेत जे सार्वजनिक हितासाठी फायदेशीर आहेत. या रिपोर्टमुळे शेतकऱ्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी मदत मिळणार आहे. काही नेत्यांनी कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच कृषी सुधारणेची मागणी करत पुढील काही महिन्यात १ लाख शेतकऱ्यांना घेऊन दिल्ली गाठणार आहे असंही अनिल घनवट यांनी सांगितले आहे. अनिल घनवट हे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आहेत. विशेष म्हणजे कृषी कायद्याच्या त्रिसदस्यीय पॅनेलनं त्यांचा रिपोर्ट १९ मार्च सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. परंतु अद्याप हा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला नाही.

एक दिवसापूर्वीच अनिल घनवट यांनी केंद्र सरकारकडून तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याबाबतचा निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी ४० वर्षापासून कृषी सुधारणेची मागणी करत आहेत. कायदा परत घेणे हे चांगलं पाऊल नाही. सध्याचा कृषी कायदा योग्य आणि पुरेसा नाही. या सरकारने कृषी सुधारणा आणण्याची इच्छाशक्ती ठेवली. याआधीच्या सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्ती नव्हती. तिन्ही कृषी कायद्यावर विचार करण्यासाठी सर्व राज्याचे विरोधी पक्ष आणि शेतकरी नेत्यांना सामावून घेत एका समितीची स्थापना करायला हवी असं मला वाटतं. समितीनं तिन्ही कायद्याचा अभ्यास करत त्याबाबत अनेकांशी बोलून १९ मार्चला रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. अनिल घनवट यांनी १ सप्टेंबरला मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून हा रिपोर्ट जनतेसमोर खुला करावा अशी विनंती केली होती. या रिपोर्टच्या शिफारशीनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं असतं असंही अनिल घनवट म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयagricultureशेती