शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

'शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करा आणि वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 10:09 IST

‘शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करुन वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या,’ अशी मागणी सुषमा कुमारी हिने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे‘शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करुन वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या,’ अशी मागणी सुषमा कुमारी हिने व्यक्त केली आहे. सुषमा कुमारीचे वडील ब्रिज किशोर यादव मंगळवारी श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले.

पाटणा- श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफच्या कॅम्पवर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवादी आणि लष्करामध्ये झालेल्या चकमकीत साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी.के. यादव शहीद झाले होते, तर बीएसएफचे तीन जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या कृत्याचा सगळीकडून निषेध केला जातो आहे. शहीद जवान बी.के.यादव यांच्या मुलीनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ‘शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करुन वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या,’ अशी मागणी सुषमा कुमारी हिने व्यक्त केली आहे. सुषमा कुमारीचे वडील ब्रिज किशोर यादव मंगळवारी श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. ‘माझ्या वडिलांचे बलिदान सार्थ ठरवण्यासाठी १०० दहशतवाद्यांची मुंडकी कापून आणा,’ असं सुषमा कुमारी यांनी म्हटलं आहे.

‘पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, असं आम्हाला वाटतं,’ अशी अपेक्षा सुषमा कुमरी यांनी व्यक्त केली आहे. ‘माझ्या कुटुंबाला आणि बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील कमलचक गावातील सर्वांना वडिलांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो,’ असंही तिने म्हंटलं आहे. ब्रिज किशोर यादव यांच्यावर बुधवारी संध्याकाळी त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीनगर विमानतळाजवळील सीमा सुरक्षा दलाच्या १८२ व्या बटालियनवर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांचा मुकाबला करताना लष्करात सहाय्यक निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या ब्रिज किशोर यादव यांना वीरमरण आलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यादव यांच्या कुटुंबीयांना ११ लाखांची मदत जाहीर केली. तर झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

यादव यांची मुलगी सुषमा कुमारी (वय 18) हिने वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. जोपर्यंत वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला जात नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबतच्या बोलण्याला काहीही अर्थ नसल्याचं सुषमा कुमारी हिने म्हंटलं आहे.  पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कडक पाऊलं उचलल्याचं आम्हाला पाहायचं आहे, असं सुषमा कुमारी यांनी म्हंटलं आहे.

नितीश कुमार यांनी व्यक्त केलं दुःखनितीश कुमार यांनी यादव यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘ब्रिज किशोर यादव यांचे बलिदान देशाच्या कायम लक्षात राहिल,’ असं मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मंगळवारी श्रीनगरमधील बीएसएफच्या बटालियनवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. पहाटे ४.३० वाजता हा हल्ला करण्यात आला. यानंतर दुपारपर्यंत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यात ब्रिज किशोर यादव शहीद झाले. तर तीन जवान जखमी झाले.