शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

‘मोदी हटाव’ हेच मुख्य लक्ष्य; सध्या तरी लग्नाचा विचार नाही - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 04:51 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेवरून हटविणे हेच सध्या आपले एकमेव लक्ष्य असल्याने लग्न करण्याचा आपला तूर्तास तरी विचार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले.

हैदराबाद - आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेवरून हटविणे हेच सध्या आपले एकमेव लक्ष्य असल्याने लग्न करण्याचा आपला तूर्तास तरी विचार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले.सुमारे तासाभराच्या वार्तालापात स्वत:च्या लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नास गांधी यांनी ‘माझे लग्न काँग्रेस पक्षाशी झाले आहे,’ एवढेच त्रोटक उत्तर दिले.एका ज्येष्ठ पत्रकाराने मोदींचा पराभव केला जाऊ शकतो, यावर शंका घेतल्यावर राहुल गांधी यांनी सन २०१९ मध्ये मोदी पराभूत होऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वास पैज मारत व्यक्त केला.‘रालोआ’मधील शिवसेनेसह इतरही काही मित्रपक्षांनात मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला नको आहेत, त्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान होण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, मोदींना पुन्हा पंतप्रधान व्हायचे असेल, तर भाजपाला स्वत:ला किमान २३० जागा जिंकाव्या लागतील. उत्तर प्रदेश व बिहारमधील सर्व जागा जिंकल्याखेरीज त्यांना हे शक्य होणार नाही. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशात व बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल काँग्रेससोबत आल्यावर भाजपाला ते कदापि शक्य होणार नाही.निवडणुकीच्या आधी भाजपाविरोधी महाआघाडी नक्की आकाराला येईल, असे सांगूत ते म्हणाले की, यासाठी समविचारी पक्षांशी बोलणी व संपर्क करणे सुरू आहे. यात पूर्वी जे आमच्या सोबत होते असे पक्ष व काही नवे पक्षही आहेत.कर्नाटकमध्ये मित्रपक्षाला आधीच मुख्यमंत्रीपद देऊ करण्याचा जो यशस्वी प्रयोग केला, तेच ‘मॉडेल’ लोकसभा निवडणुकीसाठीही वापरणार का, असे विचारता राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान कोणी व्हायचे, हा विचारही सध्या माझ्या मनात नाही. भाजपा पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. एकदा ते उद्दिष्ट साध्य झाले की, नंतर पंतप्रधान कोणी व्हायचे, याचा विचार केला जाईल.गांधी म्हणाले की, मोदींशी माझे व्यक्तिश: मतभेद नाहीत, पण त्यांच्याशी माझे सैधांतिक व धोरणांविषयी नक्कीच ठाम मतभेद आहेत. काँग्रेस गेली कित्येक दशके भाजपा आणि रा. स्व. संघाच्या विचारधारेच्या विरोधात लढत आली आहे. याच सैधांतिक आधारावर समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.बहुसंख्य समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी हल्ली तुम्ही सौम्य हिंदुत्वाकडे झुकला आहात का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, मी कट्टर किंवा सौम्य असे कोणतेच हिंदुत्व मानत नाही. मी मंदिरांमध्ये जाते व धर्मगुरूंना भेटतो, यावरून तुम्ही असे म्हणत असाल तर ते चुकीचे आहे. मी सन २००४ पासून हे करत आलो आहे. मी जेव्हा एखाद्या राज्यात जातो, तेव्हा मला धर्मगुरुंकडून निमंत्रण येते. त्यामुळे त्यांना भेटण्यात मला काही गैर वाटत नाही.मोदींशी गळाभेट कशी वाटली?पंतप्रधान मोदी यांची लोकसभेत तुम्ही गळाभेट घेतलीत, ती कशी वाटली, असे विचारता राहुल गांधी म्हणाले, माझ्याकडून त्या भेटीत प्रेमाचा व सद््भावनेचा ओलावा होता, पण मोदींना मात्र ती ‘थंड’ वाटली. मी कोणाचाही द्वेष करत नाही, हे व्यक्त करण्यासाठी मी ती गळाभेट घेतली, पण मोदींना त्यांचे राजकीय विरोधक मनापासून आवडत नाहीत. ते विरोधकांना मान देत नाहीत. ते कोणाचेही ऐकत नाहीत, पण सर्वांनी त्यांचे ऐकावे, असे त्यांना वाटते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणcongressकाँग्रेस