शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

शेतकऱ्यांचा सोमवारी भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:27 IST

शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी, प्रस्तावित कामगार कायदा, शिक्षण कायदा, वीजबिल अधिनियम आणि तिन्ही कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने बंदचे आवाहन केले आहे.

विकास झाडे -नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबरला पुकारलेल्या ‘भारत बंद’ला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली. जोपर्यंत कृषी कायदे परत घेतले जात नाहीत तोपर्यंत सीमेवर आणि गावागावांत आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी, प्रस्तावित कामगार कायदा, शिक्षण कायदा, वीजबिल अधिनियम आणि तिन्ही कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने बंदचे आवाहन केले आहे. कृषी कायदे मागे घेण्यात यावेत यासाठी २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. टिकैत म्हणाले, ‘भारत बंदचे आंदोलन सरकारविरोधात आहे, लोकांच्या विरोधात नाही. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत आंदोलन असेल. जीवनावश्यक सुविधांना बंदमधून सूट देण्यात आली आहे.’शेती सुधारणेसंबंधी तीन सुधारणा कायदे मंजूर होऊन वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला आहे. या कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या वर्षभरापासून राजधानीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. आंदोलनस्थळी देशभरातून आलेले शेतकरी ठिय्या मांडून आहेत. शिवाय वेगवेगळ्या राज्यांतही शेतकरी विरोध करीत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदच्या हाकेला अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. बंद शांततेत करण्याचे आवाहन आंदोलकांना करण्यात आले आहे. किसान मोर्चाने केंद्र-राज्य सरकारी कार्यालये, बाजार, दुकाने, महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांना बंद ठेवण्याची विनंती केली आहे.

महाविकास आघाडी सहभागी! महाराष्ट्रात महाविकास आघाडीने या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी संयुक्त किसान मोर्चाने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असून, त्यांनी भारत बंदला पाठिंबा दिल्याची माहिती गिड्डे-पाटील यांनी दिली. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीrakesh tikaitराकेश टिकैतGovernmentसरकार