शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

गांधी, पटेल यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी केले प्रामाणिक प्रयत्न- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 07:38 IST

गुजरातमध्ये २०० बेडच्या हॉस्पिटलचे उद्घाटन

राजकोट : ‘आमच्या सरकारने गत आठ वर्षांत महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या काळात सरकारने नेहमीच गरिबांच्या आत्मसन्मानाचे संरक्षण केले,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान म्हणून २६ मे रोजी ८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मोदी यांनी गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात अटकोट येथे शनिवारी २०० बेडच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी एका सभेला संबोधित केले. मोदी म्हणाले की, या आठ वर्षांत आपण असे कोणतेही काम केले नाही, ज्यामुळे लोकांची मान खाली जाईल.

महात्मा गांधी यांना असा भारत हवा होता ज्यात गरीब, दलित, आदिवासी आणि महिला सशक्त असतील. जिथे स्वच्छता आणि आरोग्य हे जीवनाचा अविभाज्य भाग असेल. अर्थव्यवस्थेला स्वदेशीचा आधार असेल. कोरोनाच्या काळात सरकारने गरिबांसाठी अन्नाचे भांडार खुले केले.  ते म्हणाले की, ‘डबल इंजिन सरकारने गुजरातचा वेगाने विकास केला आहे.’ (वृत्तसंस्था)

आठ वर्षांत तीन कोटी घरेमोदी म्हणाले की, गत आठ वर्षांत तीन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना पक्की घरे दिली आहेत. १० कोटी कुटुंबांना शौचालय उपलब्ध करून दिले, तर नऊ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देऊन चुलीच्या धुरापासून वाचविले आहे. २.५ कोटी कुटुंबांना वीज कनेक्शन दिले आहेत. सहा कोटी कुटुंबांना नळाच्या पाण्याचे कनेक्शन दिले. ५० कोटींपेक्षा अधिक लोकांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचारांसाठी संरक्षण दिले आहे. 

युद्धामुळे वाढले खतांचे दरगांधीनगर : कोरोनाची साथ आणि युक्रेनमधील युद्धामुळे खतांच्या किमतीत वाढ झाली. मात्र, देशातील शेतकऱ्यांना युरिया आणि अन्य खतांची टंचाई भासायला नको याची काळजी केंद्र सरकार घेत आहे. युरिया आयातीवर सरकार प्रति पोते ३२०० रुपयांचा भार सहन करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सहकारावरील एका परिसंवादात बोलताना ते बाेलत हाेते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपा