शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

गांधी, पटेल यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी केले प्रामाणिक प्रयत्न- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 07:38 IST

गुजरातमध्ये २०० बेडच्या हॉस्पिटलचे उद्घाटन

राजकोट : ‘आमच्या सरकारने गत आठ वर्षांत महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या काळात सरकारने नेहमीच गरिबांच्या आत्मसन्मानाचे संरक्षण केले,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान म्हणून २६ मे रोजी ८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मोदी यांनी गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात अटकोट येथे शनिवारी २०० बेडच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी एका सभेला संबोधित केले. मोदी म्हणाले की, या आठ वर्षांत आपण असे कोणतेही काम केले नाही, ज्यामुळे लोकांची मान खाली जाईल.

महात्मा गांधी यांना असा भारत हवा होता ज्यात गरीब, दलित, आदिवासी आणि महिला सशक्त असतील. जिथे स्वच्छता आणि आरोग्य हे जीवनाचा अविभाज्य भाग असेल. अर्थव्यवस्थेला स्वदेशीचा आधार असेल. कोरोनाच्या काळात सरकारने गरिबांसाठी अन्नाचे भांडार खुले केले.  ते म्हणाले की, ‘डबल इंजिन सरकारने गुजरातचा वेगाने विकास केला आहे.’ (वृत्तसंस्था)

आठ वर्षांत तीन कोटी घरेमोदी म्हणाले की, गत आठ वर्षांत तीन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना पक्की घरे दिली आहेत. १० कोटी कुटुंबांना शौचालय उपलब्ध करून दिले, तर नऊ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देऊन चुलीच्या धुरापासून वाचविले आहे. २.५ कोटी कुटुंबांना वीज कनेक्शन दिले आहेत. सहा कोटी कुटुंबांना नळाच्या पाण्याचे कनेक्शन दिले. ५० कोटींपेक्षा अधिक लोकांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचारांसाठी संरक्षण दिले आहे. 

युद्धामुळे वाढले खतांचे दरगांधीनगर : कोरोनाची साथ आणि युक्रेनमधील युद्धामुळे खतांच्या किमतीत वाढ झाली. मात्र, देशातील शेतकऱ्यांना युरिया आणि अन्य खतांची टंचाई भासायला नको याची काळजी केंद्र सरकार घेत आहे. युरिया आयातीवर सरकार प्रति पोते ३२०० रुपयांचा भार सहन करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सहकारावरील एका परिसंवादात बोलताना ते बाेलत हाेते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपा