शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
13
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
14
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
15
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
16
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
17
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
18
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
19
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
20
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत

महात्मा गांधीजी यांच्या ग्रामस्वराज्यासाठी लोकस्वराज्य पदयात्रा; बेळगावहून प्रस्थान; ३० जानेवारीला हुबळीत सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:24 IST

राम मगदूम गडहिंग्लज : देशात धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी हिंदूराष्ट्र निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. बहुपक्षीय लोकशाहीऐवजी एकपक्षीय (भाजप) सरकारमुळे संविधानाला धोका ...

राम मगदूमगडहिंग्लज : देशात धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी हिंदूराष्ट्र निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. बहुपक्षीय लोकशाहीऐवजी एकपक्षीय (भाजप) सरकारमुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे. संमिश्र अर्थव्यवस्थेऐवजी सगळी अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या हातात दिली जात आहे. त्यामुळे देशासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले असून, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. परंतु, गांधीजींच्या विचारानेच त्यावर मात करता येईल, अशी आमची भूमिका आहे. किंबहुना, गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य निर्मितीसाठीच लोकस्वराज्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी ‘लोकमत’ला दिली.महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गोगादे येथील विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानतर्फे काँग्रेसच्या सहकार्याने ही पदयात्रा काढण्यात येत आहे. बेळगाव येथील ऐतिहासिक वीर सौध-पंपसरोवरपासून पदयात्रेला सुरुवात झाली असून, ३० जानेवारीला हुबळीत पदयात्रेची सांगता होणार आहे.दिवाण म्हणाले, महात्मा फुले यांनी शिक्षण सर्वांना मुक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘चवदार’ तळ्याच्या सत्याग्रहातून पाणी खुले केले. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहातून लोकांना नैसर्गिक संपत्तीवरील अधिकार दिला. विनोबाजींनी भूदान चळवळीतून भूमिहीनांना जमीन मिळवून दिली.महागड्या शिक्षणामुळे आज बहुजनांना पुन्हा ज्ञानापासून वंचित ठेवले जात आहे. पाण्याला विक्रीची वस्तू बनविल्यामुळे जनता पाण्याला महाग झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवरील भूमिपुत्रांचा अधिकार काढून घेऊन अधिवासी, भटके-विमुक्तांना विस्थापित केले जात आहे.विकास प्रकल्पाच्या नावाखाली सरकार आणि भांडवलदार जमिनी हिसकावून घेत आहेत. किंबहुना, चेहरा बदलून वर्णव्यवस्थाच येत असून, पुन्हा ‘मनुस्मृती’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंडित नेहरू यांनी बहुपक्षीय लोकशाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, संमिश्र अर्थव्यवस्था व अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण या मजबूत पायावर देशाची उभारणी केली. त्यांच्या विचारांनाच सुरुंग लावला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.५०० किलोमीटर, ३४ दिवस..!१९५८ मध्ये विनोबाजींनी बेळगावपासून भूदान पदयात्रा काढून हुबळीत मुक्काम केला होता. त्याच मार्गाने सुमारे ५०० किलोमीटरची ३४ दिवसांची ही पदयात्रा काढण्यात येत आहे. देशभरातील काँग्रेस व सर्वोदयी कार्यकर्ते आणि गांधीप्रेमी नागरिक पदयात्रेत सहभागी होणार आहेत, असे समन्वयक किरणभाई मुगबसव (हुबळी) यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahatma Gandhiमहात्मा गांधीbelgaonबेळगाव