शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मोठी दुर्घटना! महाशिवरात्रीला झारखंडच्या बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी; अनेक भाविक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 12:20 IST

Mahashivratri 2022 : झारखंडमधील बाबाधाम मंदिरात प्रचंड गर्दी झाली आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली - महाशिवरात्री (Mahashivratri) निमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. विविध मंदिरांत आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील बाबाधाम मंदिरात प्रचंड गर्दी झाली आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनेमुळे काही वेळ मंदिरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने केलेली व्यवस्था कोलमडली. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दर्शन काऊंटरजवळ चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक पुरुष आणि महिला जखमी झाले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाने भाविकांवर लाठीचार्ज केला असल्याचं सांगण्यात येत आहे. हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. पूजा आणि दर्शनासाठी आलेले बरकागावचे आमदार अंबा प्रसाद यांनाही जिल्हा प्रशासनाने सहकार्य केले नाही.

अंबा प्रसाद यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात

मंदिराच्या व्यवस्थापकाने आमदार अंबा प्रसाद यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आमदार अंबा प्रसाद जखमींना भेटण्यासाठी पोहोचल्या आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची तक्रार करण्यासाठी एसडीओकडे पोहचल्या तेव्हा त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आमदार अंबा प्रसाद यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत भाविकांची योग्य ती व्यवस्था केली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच आमदार या नात्याने नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी मी देवघर येथे दाखल झाले.

"मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली नाही"

 एसडीओ दिनेश कुमार यादव आणि मंदिर व्यवस्थापक रमेश परिहर यांनी वाद घातल्याचाही आरोप आमदार अंबा प्रसाद यांनी केला आहे. आमदार अंबा प्रसाद यांनी या घटनेनंतर या प्रकरणाची मी वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहे. मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली नाही. प्रशासन केवळ व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींसाठी कार्यरत आहे. सर्वसामान्य भाविकांच्या समस्या कुणीही ऐकून घेत नाही असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीJharkhandझारखंड