शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ नंतर महाराष्ट्राची तीन वेगळी राज्य करणार; भाजपा मंत्र्याचा दावा भाजपाच्या CMनी फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 17:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात ५० नवी राज्ये निर्माण करणार आहेत. भाजपाच्या एवढ्या बड्या मंत्र्याने हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात राजकीय संकट आलेले असताना शेजारील कर्नाटकमधील भाजपा मंत्र्याने मोठी खळबळ उडविणारे वक्तव्य केले आहे. नरेंद्र मोदी २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात एकूण ५० राज्ये निर्माण करणार असल्याचे या मंत्र्याने म्हटले आहे. यावर भाजपाच्याच मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. 

सीमाभागातील कर्नाटकचे आमदार आणि मंत्री उमेश कत्ती यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. बार काऊन्सिलच्या बैठकीत त्यांनी हा दावा केला आहे. वेगळ्या उत्तर कर्नाटकसाठी आपल्याला लढा द्यावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात ५० नवी राज्ये निर्माण करणार आहेत. महाराष्ट्र तीन भागांत विभागला जाईल, तर कर्नाटक दोन भागांत विभागला जाईल, असे ते म्हणाले. 

यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी कत्ती यांचा राज्यांचे विभाजन करण्याचा दावा फेटाळून लावला आहे. सरकार अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आणण्याची योजना तयार करत नसल्याचे ते म्हणाले. कत्ती यांनी आधीही अशाप्रकारची विधाने केली आहेत. आता त्यांनी स्वत:च या प्रश्नावर उत्तर द्यायला हवे, असेही बोम्मई म्हणाले. 

उमेश कत्ती हे कर्नाटकचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार आणि वन मंत्री पदही आहे. एवढ्या बड्या मंत्र्याने हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. पुढील लोकसभा निवडणुकीनंतर देशात ५० हून अधिक राज्ये निर्माण होतील, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. संपूर्ण कर्नाटकात पसरलेल्या लोकसंख्येच्या आधारावर उत्तर कर्नाटकही वेगळे राज्य होणार हे निश्चित. 2024 च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: नवीन राज्यांची स्थापना करतील. महाराष्ट्र तीन, कर्नाटक दोन आणि उत्तर प्रदेश चार राज्ये होतील, असे कट्टी म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आयटी कंपन्यांनी बेंगळुरूच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे. उत्तर कर्नाटकात प्रचंड क्षमता आहे. बंगळुरू आता गर्दीचे शहर बनले आहे. वाहतूक कोंडी आणि पाण्याची समस्या आहे, असेही ते म्हणाले. 2019 मध्ये देखील कट्टी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पांकडे उत्तर कर्नाटकला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक