शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

२०२४ नंतर महाराष्ट्राची तीन वेगळी राज्य करणार; भाजपा मंत्र्याचा दावा भाजपाच्या CMनी फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 17:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात ५० नवी राज्ये निर्माण करणार आहेत. भाजपाच्या एवढ्या बड्या मंत्र्याने हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात राजकीय संकट आलेले असताना शेजारील कर्नाटकमधील भाजपा मंत्र्याने मोठी खळबळ उडविणारे वक्तव्य केले आहे. नरेंद्र मोदी २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात एकूण ५० राज्ये निर्माण करणार असल्याचे या मंत्र्याने म्हटले आहे. यावर भाजपाच्याच मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. 

सीमाभागातील कर्नाटकचे आमदार आणि मंत्री उमेश कत्ती यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. बार काऊन्सिलच्या बैठकीत त्यांनी हा दावा केला आहे. वेगळ्या उत्तर कर्नाटकसाठी आपल्याला लढा द्यावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात ५० नवी राज्ये निर्माण करणार आहेत. महाराष्ट्र तीन भागांत विभागला जाईल, तर कर्नाटक दोन भागांत विभागला जाईल, असे ते म्हणाले. 

यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी कत्ती यांचा राज्यांचे विभाजन करण्याचा दावा फेटाळून लावला आहे. सरकार अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आणण्याची योजना तयार करत नसल्याचे ते म्हणाले. कत्ती यांनी आधीही अशाप्रकारची विधाने केली आहेत. आता त्यांनी स्वत:च या प्रश्नावर उत्तर द्यायला हवे, असेही बोम्मई म्हणाले. 

उमेश कत्ती हे कर्नाटकचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार आणि वन मंत्री पदही आहे. एवढ्या बड्या मंत्र्याने हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. पुढील लोकसभा निवडणुकीनंतर देशात ५० हून अधिक राज्ये निर्माण होतील, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. संपूर्ण कर्नाटकात पसरलेल्या लोकसंख्येच्या आधारावर उत्तर कर्नाटकही वेगळे राज्य होणार हे निश्चित. 2024 च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: नवीन राज्यांची स्थापना करतील. महाराष्ट्र तीन, कर्नाटक दोन आणि उत्तर प्रदेश चार राज्ये होतील, असे कट्टी म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आयटी कंपन्यांनी बेंगळुरूच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे. उत्तर कर्नाटकात प्रचंड क्षमता आहे. बंगळुरू आता गर्दीचे शहर बनले आहे. वाहतूक कोंडी आणि पाण्याची समस्या आहे, असेही ते म्हणाले. 2019 मध्ये देखील कट्टी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पांकडे उत्तर कर्नाटकला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक