शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढतेय, 'ताप'दायक लाटेचा महाराष्ट्राला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 06:13 IST

या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या ५० वर्षांच्या उष्णतामानाचा अभ्यास अलीकडेच करण्यात आला.

आधीच उष्णकटिबंधीय देश म्हणून ओळख असलेल्या आपल्या देशात उष्णतेचे प्रमाण वर्षागणिक वाढू लागले आहे. दरवर्षी उष्माघाताच्या बळींमध्ये वाढही होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या ५० वर्षांच्या उष्णतामानाचा अभ्यास अलीकडेच करण्यात आला. उष्णतेच्या लाटांचे ३ नवीन हॉटस्पॉट देशात निर्माण झाल्याचे आढळून आले. त्यात महाराष्ट्रातील काही भागांचा समावेशही आहे.

कोणी केला अभ्यास?भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि महामना सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लायमेट चेंज रिसर्च (एमसीईसीसीआर) यांनी संयुक्तपणे बनारस हिंदु विद्यापीठात भारतातील बदलते हवामान या विषयावर अभ्यास केला.७० वर्षांच्या कालावधीत देशाच्या विविध उपविभागांमध्ये गेल्या उष्णतामानात काय बदल झाला, याचा सखोल अभ्यास यावेळी करण्यात आला. त्याचा निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लायमेटॉलॉजी या मासिकात प्रकाशित करण्यात आला.

काय आढळले अभ्यासात?वायव्य, मध्य आणि दक्षिण-मध्य भारत या तीन टापूंमध्ये अलीकडच्या काळात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढल्याचे प्रामुख्याने आढळून आले.त्या दृष्टीने हे तीनही टापू उष्णतेच्या लाटांचे नवीन केंद्र (हॉटस्पॉट) बनल्याचा निष्कर्ष अभ्यासात काढण्यात आला.

विदर्भात लाटांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांत मध्य महाराष्ट्रातही लाट वाढली आहे. अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली  आणि नांदेडचा काही भाग या ठिकाणी लाटा अधिक तीव्र झाल्या आहेत. याशिवाय विदर्भातील इतर जिल्ह्यांतही उष्णतेच्या लाटा वाढू लागल्या आहेत. खांदेशातही उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत.

परिणाम काय?पश्चिम बंगाल, बिहारपासून वायव्येकडे तसेच मध्य आणि दक्षिण मध्य भारतातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारींत वाढल्या.मध्य भारताकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढल्याने या टापूतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले.शेती, पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्था यांच्यावरही उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला.  

 

 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई