शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढतेय, 'ताप'दायक लाटेचा महाराष्ट्राला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 06:13 IST

या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या ५० वर्षांच्या उष्णतामानाचा अभ्यास अलीकडेच करण्यात आला.

आधीच उष्णकटिबंधीय देश म्हणून ओळख असलेल्या आपल्या देशात उष्णतेचे प्रमाण वर्षागणिक वाढू लागले आहे. दरवर्षी उष्माघाताच्या बळींमध्ये वाढही होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या ५० वर्षांच्या उष्णतामानाचा अभ्यास अलीकडेच करण्यात आला. उष्णतेच्या लाटांचे ३ नवीन हॉटस्पॉट देशात निर्माण झाल्याचे आढळून आले. त्यात महाराष्ट्रातील काही भागांचा समावेशही आहे.

कोणी केला अभ्यास?भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि महामना सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लायमेट चेंज रिसर्च (एमसीईसीसीआर) यांनी संयुक्तपणे बनारस हिंदु विद्यापीठात भारतातील बदलते हवामान या विषयावर अभ्यास केला.७० वर्षांच्या कालावधीत देशाच्या विविध उपविभागांमध्ये गेल्या उष्णतामानात काय बदल झाला, याचा सखोल अभ्यास यावेळी करण्यात आला. त्याचा निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लायमेटॉलॉजी या मासिकात प्रकाशित करण्यात आला.

काय आढळले अभ्यासात?वायव्य, मध्य आणि दक्षिण-मध्य भारत या तीन टापूंमध्ये अलीकडच्या काळात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढल्याचे प्रामुख्याने आढळून आले.त्या दृष्टीने हे तीनही टापू उष्णतेच्या लाटांचे नवीन केंद्र (हॉटस्पॉट) बनल्याचा निष्कर्ष अभ्यासात काढण्यात आला.

विदर्भात लाटांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांत मध्य महाराष्ट्रातही लाट वाढली आहे. अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली  आणि नांदेडचा काही भाग या ठिकाणी लाटा अधिक तीव्र झाल्या आहेत. याशिवाय विदर्भातील इतर जिल्ह्यांतही उष्णतेच्या लाटा वाढू लागल्या आहेत. खांदेशातही उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत.

परिणाम काय?पश्चिम बंगाल, बिहारपासून वायव्येकडे तसेच मध्य आणि दक्षिण मध्य भारतातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारींत वाढल्या.मध्य भारताकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढल्याने या टापूतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले.शेती, पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्था यांच्यावरही उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला.  

 

 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई