शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढतेय, 'ताप'दायक लाटेचा महाराष्ट्राला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 06:13 IST

या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या ५० वर्षांच्या उष्णतामानाचा अभ्यास अलीकडेच करण्यात आला.

आधीच उष्णकटिबंधीय देश म्हणून ओळख असलेल्या आपल्या देशात उष्णतेचे प्रमाण वर्षागणिक वाढू लागले आहे. दरवर्षी उष्माघाताच्या बळींमध्ये वाढही होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या ५० वर्षांच्या उष्णतामानाचा अभ्यास अलीकडेच करण्यात आला. उष्णतेच्या लाटांचे ३ नवीन हॉटस्पॉट देशात निर्माण झाल्याचे आढळून आले. त्यात महाराष्ट्रातील काही भागांचा समावेशही आहे.

कोणी केला अभ्यास?भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि महामना सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लायमेट चेंज रिसर्च (एमसीईसीसीआर) यांनी संयुक्तपणे बनारस हिंदु विद्यापीठात भारतातील बदलते हवामान या विषयावर अभ्यास केला.७० वर्षांच्या कालावधीत देशाच्या विविध उपविभागांमध्ये गेल्या उष्णतामानात काय बदल झाला, याचा सखोल अभ्यास यावेळी करण्यात आला. त्याचा निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लायमेटॉलॉजी या मासिकात प्रकाशित करण्यात आला.

काय आढळले अभ्यासात?वायव्य, मध्य आणि दक्षिण-मध्य भारत या तीन टापूंमध्ये अलीकडच्या काळात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढल्याचे प्रामुख्याने आढळून आले.त्या दृष्टीने हे तीनही टापू उष्णतेच्या लाटांचे नवीन केंद्र (हॉटस्पॉट) बनल्याचा निष्कर्ष अभ्यासात काढण्यात आला.

विदर्भात लाटांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांत मध्य महाराष्ट्रातही लाट वाढली आहे. अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली  आणि नांदेडचा काही भाग या ठिकाणी लाटा अधिक तीव्र झाल्या आहेत. याशिवाय विदर्भातील इतर जिल्ह्यांतही उष्णतेच्या लाटा वाढू लागल्या आहेत. खांदेशातही उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत.

परिणाम काय?पश्चिम बंगाल, बिहारपासून वायव्येकडे तसेच मध्य आणि दक्षिण मध्य भारतातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारींत वाढल्या.मध्य भारताकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढल्याने या टापूतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले.शेती, पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्था यांच्यावरही उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला.  

 

 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई