शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

Maharashtraने थकविले कोळशाचे 3 हजार कोटी, ४ राज्यांकडे ८ हजार थकीत, त्वरित पैसे देण्याची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:23 IST

Maharashtra: देशभरात काेळसा टंचाई आणि त्यामुळे विजेचे संकट ओढावलेले असतानाच महाराष्ट्रासह काही राज्यांकडे जवळपास आठ हजार काेटी रुपयांची काेळशाची थकबाकी असल्याची माहिती समाेर आली आहे.

नवी दिल्ली : देशभरात काेळसा टंचाई आणि त्यामुळे विजेचे संकट ओढावलेले असतानाच महाराष्ट्रासह काही राज्यांकडे जवळपास आठ हजार काेटी रुपयांची काेळशाची थकबाकी असल्याची माहिती समाेर आली आहे. या राज्यांनी ही थकबाकी लवकर भरावी, अशा सूचना केंद्र सरकारने केली आहे.  महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांकडे ७ हजार ९७४ काेटी रुपयांची थकबाकी आहे. काेळशा खरेदीपाेटी काेल इंडियाकडे हे पैसे थकीत आहेत. माेठ्या प्रमाणावर थकबाकी असल्यामुळे राज्यांना पुरेसा काेळसा साठा ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या, असे केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

या राज्यांमध्ये सर्वाधिक औष्णिक वीजनिर्मिती हाेते. जेमतेम एक किंवा दाेन दिवस पुरेल एवढा काेळशाचा साठा या चार राज्यांकडे आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस काेल इंडियाची देशातील सर्व वीजनिर्मिती कंपन्या आणि वीज मंडळांची २१ हजार ६१९ काेटी रुपयांची थकबाकीहाेती.

गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विजेची मागणी वाढली आहे. मात्र, काेळसा पुरवठ्यातील अडचणी तसेच अपुरा साठा असल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. केंद्रीय वीज नियामक आयाेगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १५ ते ३० दिवसांचा साठा ठेवणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अनेक ऊर्जा प्रकल्पांमध्ये एक ते चार दिवसांचाच साठा आहे.  

केंद्राकडून मिळणारी वीज राज्यांनी विकल्यास कारवाई- देशामध्ये अपुऱ्या काेळशामुळे वीजटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. -अशा परिस्थितीत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने राज्यांना वीजवापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. - त्यांचे उल्लंघन झाल्यास वीजपुरवठा कमी करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.  - ऊर्जा मंत्रालयाच्या सूचनांनुसार, राज्यांना केंद्रीय वीजनिर्मिती केंद्रांवरून पुरविण्यात येणारी वीज ग्राहकांसाठीच वापरावी. -अतिरिक्त वीज उपलब्ध असल्यास माहिती द्यावी, जेणेकरून गरजू राज्यांना पुरवठा करता येईल. मात्र, एखादे राज्य पाॅवर एक्स्चेंजमध्ये वीजविक्री करताना आढळल्यास त्यांचा पुरवठा कमी केला जाऊ शकताे किंवा वीज परत घेतली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. - वीज वितरक कंपन्यांना ६० दिवसांमध्ये मान्यताप्राप्त ऊर्जा लेखा परीक्षकाद्वारे तिमाही ऊर्जा लेखांकन करणे आवश्यक आहे. केंद्राची सूचनाज्या राज्यांमध्ये उच्च औष्णिक वीजनिर्मिती क्षमता आहे, त्यांनी काेल इंडियाची थकबाकी लवकरात लवकर द्यावी, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत.महाराष्ट्राकडे३,१७६.१उत्तर प्रदेशकडे२,७४३.१तामिळनाडूकडे१,२८१.७राजस्थानकडे७७४ काेटी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रelectricityवीज