शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtraने थकविले कोळशाचे 3 हजार कोटी, ४ राज्यांकडे ८ हजार थकीत, त्वरित पैसे देण्याची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:23 IST

Maharashtra: देशभरात काेळसा टंचाई आणि त्यामुळे विजेचे संकट ओढावलेले असतानाच महाराष्ट्रासह काही राज्यांकडे जवळपास आठ हजार काेटी रुपयांची काेळशाची थकबाकी असल्याची माहिती समाेर आली आहे.

नवी दिल्ली : देशभरात काेळसा टंचाई आणि त्यामुळे विजेचे संकट ओढावलेले असतानाच महाराष्ट्रासह काही राज्यांकडे जवळपास आठ हजार काेटी रुपयांची काेळशाची थकबाकी असल्याची माहिती समाेर आली आहे. या राज्यांनी ही थकबाकी लवकर भरावी, अशा सूचना केंद्र सरकारने केली आहे.  महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांकडे ७ हजार ९७४ काेटी रुपयांची थकबाकी आहे. काेळशा खरेदीपाेटी काेल इंडियाकडे हे पैसे थकीत आहेत. माेठ्या प्रमाणावर थकबाकी असल्यामुळे राज्यांना पुरेसा काेळसा साठा ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या, असे केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

या राज्यांमध्ये सर्वाधिक औष्णिक वीजनिर्मिती हाेते. जेमतेम एक किंवा दाेन दिवस पुरेल एवढा काेळशाचा साठा या चार राज्यांकडे आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस काेल इंडियाची देशातील सर्व वीजनिर्मिती कंपन्या आणि वीज मंडळांची २१ हजार ६१९ काेटी रुपयांची थकबाकीहाेती.

गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विजेची मागणी वाढली आहे. मात्र, काेळसा पुरवठ्यातील अडचणी तसेच अपुरा साठा असल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. केंद्रीय वीज नियामक आयाेगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १५ ते ३० दिवसांचा साठा ठेवणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अनेक ऊर्जा प्रकल्पांमध्ये एक ते चार दिवसांचाच साठा आहे.  

केंद्राकडून मिळणारी वीज राज्यांनी विकल्यास कारवाई- देशामध्ये अपुऱ्या काेळशामुळे वीजटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. -अशा परिस्थितीत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने राज्यांना वीजवापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. - त्यांचे उल्लंघन झाल्यास वीजपुरवठा कमी करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.  - ऊर्जा मंत्रालयाच्या सूचनांनुसार, राज्यांना केंद्रीय वीजनिर्मिती केंद्रांवरून पुरविण्यात येणारी वीज ग्राहकांसाठीच वापरावी. -अतिरिक्त वीज उपलब्ध असल्यास माहिती द्यावी, जेणेकरून गरजू राज्यांना पुरवठा करता येईल. मात्र, एखादे राज्य पाॅवर एक्स्चेंजमध्ये वीजविक्री करताना आढळल्यास त्यांचा पुरवठा कमी केला जाऊ शकताे किंवा वीज परत घेतली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. - वीज वितरक कंपन्यांना ६० दिवसांमध्ये मान्यताप्राप्त ऊर्जा लेखा परीक्षकाद्वारे तिमाही ऊर्जा लेखांकन करणे आवश्यक आहे. केंद्राची सूचनाज्या राज्यांमध्ये उच्च औष्णिक वीजनिर्मिती क्षमता आहे, त्यांनी काेल इंडियाची थकबाकी लवकरात लवकर द्यावी, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत.महाराष्ट्राकडे३,१७६.१उत्तर प्रदेशकडे२,७४३.१तामिळनाडूकडे१,२८१.७राजस्थानकडे७७४ काेटी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रelectricityवीज