शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 04:44 IST

देशात सर्वाधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : देशात सर्वाधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशात २०१६साली शेतकरी व शेतमजूर मिळून ११,३७० जणांनी आत्महत्या केली. त्यातील ३६६१ महाराष्ट्रातील होते. ही धक्कादायक आकडेवारी सरकारने संसदेत दिली. राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण ब्युरोने (एनसीआरबी) २०१६ साठी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी संबंधित हंगामी माहिती दिली. तीत म्हटले आहे की, महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्य आहे. तेथे २०७९ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केली. तिसºया क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. तेथे २०१६ मध्ये शेतकरी व शेतमजूर मिळून १३२१ आत्महत्या झाल्या आहेत.वेगवेगळ््या राज्यांतील शेतकºयांच्या आत्महत्या जास्तही असू शकतात. कारण ही तात्पुरती आकडेवारी आहे. सविस्तर अहवाल बनवण्यासाठी आणखी बारकाईने अभ्यास केल्यास आकड्यात बदल होऊ शकतो. शेतकरी आत्महत्येचा विषय संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत अनेक सदस्यांनी उपस्थित केला. त्यात तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांच्यासह इतर खासदारांचा समावेश होता.एनसीआरबीने दिलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शेतीच्या कामात सक्रिय असलेले ११११ मजूर आणि २५५० शेतकºयांनी आत्महत्या केली.गोव्यात फक्त एका शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देशात आठ राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत याच कालावधीत एकही अशी आत्महत्या झाल्याचे समोर आलेले नाही. ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत बिहार, लक्षद्वीप, दमण-दीव, दादरा- नगर हवेली, चंदीगढ, दिल्ली, पश्चिम बंगाल, नागालँडचा समावेश आहे.केंद्रीय कृषी मंत्रालय आणि नीती आयोग एकत्र येऊन शेती लाभदायक व्हावी यासाठी काम करत आहे. सरकारने नुकताच शेतमालाला हमीभाव दुपट्ट केला. या परिस्थितीत येत्या काळात काही चांगले बदल घडतील अशी आशा आहे.>शेतमजुरांचेही प्रमाण मोठेएनसीआरबीने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये देशात एकूण १२,३६० आणि २०१५ मध्ये १२,६०२ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केली होती. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर २०१४ मध्ये एकूण ४,००४ शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली. त्यात १,४३६ शेतमजूर तर २,५६८ शेतकरी होते. २०१५ मध्ये एकूण ४,२९१ शेतकरी-शेतमजुरांनी आत्महत्या केली होती. यात शेतकरी ३,०३० तर १,२६१ शेतमजूर होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या