शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची सुनावणी २१ जानेवारीला होणार; सर्वोच्च न्यायालयाने दिली तारीख

By विश्वास पाटील | Updated: October 28, 2025 12:55 IST

महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठपुरावा

विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या दाव्याची सुनावणी २१ जानेवारी २०२६ ला होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयास केली. त्याची सुनावणी सोमवारी न्यायमूर्ती संजयकुमार व न्यायमूर्ती आरोक आराध्ये यांच्यासमोर झाली.महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरिष्ठ वकील वैद्यनाथन व ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी बाजू मांडली. राज्य शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य व निवृत्त पणन संचालक दिनेश ओऊळकर या दाव्याचा पाठपुरावा करत आहेत.या दाव्याची शेवटची सुनावणी १० मार्च २०१७ ला झाली आहे. त्यानंतर सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश हे महाराष्ट्र किंवा कर्नाटकचे झाल्याने न्यायालयीन संकेत म्हणून त्यांच्याकडून या दाव्याची सुनावणीच झालेली नाही. हा मूळ दावा महाराष्ट्र शासनाच्या वतीने २९ मार्च २००४ ला (क्रमांक ४-२००४) दाखल केला आहे. राजकीय पातळीवर सगळ्या लढाया करूनही जेव्हा हा प्रश्न सुटत नाही असे दिसू लागल्यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने घटनेच्या ‘अनुच्छेद १३१ ब’अन्वये हा दावा दाखल करण्यात आला. त्यामध्ये बिदर, गुलबर्गी, बेळगाव आणि कारवार या चार जिल्ह्यांतील ८६५ मराठी भाषिक गावांचा हक्क हिरावून घेतल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. दोन राज्यांतील किंवा केंद्र व राज्य सरकारमधील वादात केंद्र सरकारकडून जेव्हा तोडगा निघत नाही तेव्हा ‘अनुच्छेद १३१ ब’अन्वये दाद मागता येते. त्या दाव्यावर कर्नाटकने १२ सप्टेंबर २०१४ ला हरकत घेऊन हा दावाच रद्द करण्याची मागणी केली; परंतु तत्कालीन सरन्यायाधीश लोढा यांनी तो अर्ज फेटाळून लावला व अशी दाद मागण्याचा हक्क असल्याचा स्पष्ट केले.

तेव्हा कर्नाटक शासन गप्प बसले; परंतु नवीन न्यायाधीश नियुक्त होताच त्यांनी पुन्हा हाच अर्ज दिला व त्याची शेवटची सुनावणी २३ जानेवारी २०१७ ला झाली. त्यामध्ये महाराष्ट्राच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी तब्बल ४० मिनिटे जोरदार बाजू मांडली. त्यानंतर कोविड आणि अन्य कारणांमुळे ही सुनावणीच झालेली नाही. आता नवीन वर्षात यामध्ये काही चांगले घडेल अशी अपेक्षा महाराष्ट्राला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra-Karnataka border dispute hearing set for January 21, 2026: Supreme Court

Web Summary : The Supreme Court will hear the Maharashtra-Karnataka border dispute case on January 21, 2026. Maharashtra seeks to reclaim 865 Marathi-speaking villages in Karnataka. The case, filed in 2004, faced delays due to judicial recusals and COVID. Maharashtra hopes for a positive outcome.