शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सुशांतसिंहप्रकरणी सीबीआय चौकशीस महाराष्ट्र सरकारचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 03:14 IST

बिहारची राजधानी पाटणा येथील आयपीएस अधिकारी विनय तिवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले.

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी बिहार सरकारने केलेली मागणी केंद्राने मान्य केली असतानाच, सीबीआय चौकशीला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शविला आहे. पाटण्याचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून सोडण्यास मुंबई महानगरपालिकेने नकार दिला असून तसे पत्र बिहार पोलिसांना पाठविले आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथील आयपीएस अधिकारी विनय तिवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्या कृतीमुळे चुकीची संदेश गेल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा स्थितीदर्शक अहवाल सादर करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पाटणा येथे नोंदविण्यात आलेला एफआयआर मुंबईमध्ये वर्ग करण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका सुशांतची मैत्रिण रिया चक्रवतीर्ने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर बिहार, महाराष्ट्राची राज्य सरकारे, केंद्र सरकार तसेच सुशांतसिंह राजपूत याच्या वडीलांनी तीन दिवसांच्या आत उत्तर सादर करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या याचिकेच्या सुनावणीप्रसंगी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी ही बिहार सरकारने केलेली शिफारस आम्ही मान्य केली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यास महाराष्ट्र सरकारने विरोध दर्शविला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्मह्त्या प्रकरणी राजकीय हेतूने पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, असे महाराष्टÑ सरकारच्या वतीने सांगण्यात आले.बिहार पोलिसांना या प्रकरणी चौकशी करण्याचा कोणताही अधिकार नाही असा महाराष्ट्र सरकारचा दावा आहे.पाटणा येथील आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून सोडण्यास मुंबई महानगरपालिकेने नकार दिला आहे. कोरोना साथीचा फैलाव लक्षात घेता विनय तिवारी त्यांच्या कामासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी झूम, गुगल मिट, जिओ मिट, मायक्रोसॉफ्ट इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून संपर्क साधू शकतात, असे मुंबई महानगरपालिकेने बिहार पोलिसांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तिवारी यांना क्वारंटाइनमधून सोडावे असे पत्र बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई महानगरपालिकेला लिहिले होते. पण त्यांची विनंती महापालिकेने मान्य केली नाही. ही माहिती पांडे यांनी टिष्ट्वट करून दिली आहे.रियाच्या चौकशीचा बिहार पोलिसांचा मार्ग मोकळाअभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची बिहार पोलीस आता चौकशी करू शकतात. त्यातील अडथळा सर्वोच्च न्यायालयाने दूर केला आहे. अशी चौकशी करू नये म्हणून अंतरिम आदेश देण्याची रिया चक्रवर्तीने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSushant Singhसुशांत सिंगPoliceपोलिस