शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

सुशांतसिंहप्रकरणी सीबीआय चौकशीस महाराष्ट्र सरकारचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 03:14 IST

बिहारची राजधानी पाटणा येथील आयपीएस अधिकारी विनय तिवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले.

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी बिहार सरकारने केलेली मागणी केंद्राने मान्य केली असतानाच, सीबीआय चौकशीला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शविला आहे. पाटण्याचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून सोडण्यास मुंबई महानगरपालिकेने नकार दिला असून तसे पत्र बिहार पोलिसांना पाठविले आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथील आयपीएस अधिकारी विनय तिवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्या कृतीमुळे चुकीची संदेश गेल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा स्थितीदर्शक अहवाल सादर करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पाटणा येथे नोंदविण्यात आलेला एफआयआर मुंबईमध्ये वर्ग करण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका सुशांतची मैत्रिण रिया चक्रवतीर्ने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर बिहार, महाराष्ट्राची राज्य सरकारे, केंद्र सरकार तसेच सुशांतसिंह राजपूत याच्या वडीलांनी तीन दिवसांच्या आत उत्तर सादर करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या याचिकेच्या सुनावणीप्रसंगी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी ही बिहार सरकारने केलेली शिफारस आम्ही मान्य केली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यास महाराष्ट्र सरकारने विरोध दर्शविला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्मह्त्या प्रकरणी राजकीय हेतूने पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, असे महाराष्टÑ सरकारच्या वतीने सांगण्यात आले.बिहार पोलिसांना या प्रकरणी चौकशी करण्याचा कोणताही अधिकार नाही असा महाराष्ट्र सरकारचा दावा आहे.पाटणा येथील आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून सोडण्यास मुंबई महानगरपालिकेने नकार दिला आहे. कोरोना साथीचा फैलाव लक्षात घेता विनय तिवारी त्यांच्या कामासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी झूम, गुगल मिट, जिओ मिट, मायक्रोसॉफ्ट इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून संपर्क साधू शकतात, असे मुंबई महानगरपालिकेने बिहार पोलिसांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तिवारी यांना क्वारंटाइनमधून सोडावे असे पत्र बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई महानगरपालिकेला लिहिले होते. पण त्यांची विनंती महापालिकेने मान्य केली नाही. ही माहिती पांडे यांनी टिष्ट्वट करून दिली आहे.रियाच्या चौकशीचा बिहार पोलिसांचा मार्ग मोकळाअभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची बिहार पोलीस आता चौकशी करू शकतात. त्यातील अडथळा सर्वोच्च न्यायालयाने दूर केला आहे. अशी चौकशी करू नये म्हणून अंतरिम आदेश देण्याची रिया चक्रवर्तीने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSushant Singhसुशांत सिंगPoliceपोलिस