शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

Maharashtra Election 2019: लिंबू ठेवणं ही अंधश्रद्धा नव्हे, अर्थमंत्र्यांकडून राजनाथ सिंहांचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 12:41 IST

Maharashtra Election 2019: राजनाथ सिंह यांनी राफेल विमानासमोर लिंबू ठेवले या मुद्द्यावर निर्मला सितारमण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की,

पुणे - भारतीय हवाईदलाने मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिले राफेल लढाऊ विमान औपचारिकरीत्या स्वीकारले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची पूजा करण्यात आली होती. लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्याने विरोधकांसह सोशल मीडियावरुनही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याचं स्पष्टीकरण माजी संरक्षणमंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिलंय. तसेच, ही श्रद्धा असून अंधश्रद्धा नसल्याचंही सितारमण यांनी म्हटलं.  

राजनाथ सिंह यांनी राफेलसमोर लिंबू ठेवले या मुद्द्यावर निर्मला सितारमण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांनी ओम लिहिला त्यात काय चुकीचे आहे? ही अंधश्रद्धा आहे? प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार काम करतो. पूर्वीचे संरक्षणमंत्री आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या धर्म पद्धतीने देशासाठी संरक्षण सामुग्री ताब्यात घेताना पूजा केली होती, असे म्हणत ए.के.अँटोनी यांचे नाव न घेता त्यांनी काँग्रेसच्या काळातील संरक्षणमंत्र्यांची आठवण करून दिली. तसेच, तेव्हा कोणी काहीही केल नाही, चर्चाही केली नाही, असे सितारमण यांनी म्हटले. ज्यांचा विश्वास आहे ते करतात, विजयादशमीला शस्त्रपूजा ही आपली संस्कृती आहे. त्यांनी परंपरा पाळली, त्यात काही चुकीचे नाही, असे म्हणत राजनाथसिंह यांच्या राफेल पूजनाचे आणि लिंबू ठेवण्याचे सितारमण यांनी समर्थन केलं आहे. कलम 370 हा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मुद्दा कसा होऊ शकतो का याबाबतही त्या म्हणाल्या की, हा देशाच्या सुरक्षिततेसाठी अतिमहत्वाचा मुद्दा आहे. फक्त महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशासाठी महत्वाचा आहे.प्रत्येक भारतीयाला त्याबद्दल अभिमान हवा. हा निर्णय झाल्यावर जम्मू आणि काश्मीरमध्ये तिथे एकही गोळी चालली नाही. तेथील वातावरण सुरळीत आहे. मात्र, आम्ही बेरोजगारी, आर्थिक मुद्दे याबाबतीतही तितकेच गंभीर आहोत. या दोन मुद्द्यांची बरोबरी होऊ शकत नाही. हा मुद्दा महाराष्ट्राच्या जाहीरनाम्यात कोणी घेतला, हे मला माहिती नाही, असेही त्यांनी म्हटले. 

दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनीही या लिंबाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले की, भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात नवीन लढाऊ विमान दाखल झाल्याचा मला आनंद आहे. मात्र जेव्हा राफेल खरेदी केले तेव्हा विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यात आले. मी जर एखादी नवीन गाडी घेतली असती तर लिंबू कापून त्याचे सरबत बनवून लोकांना पाजलं असतं असं सांगत सरकारच्या या कृतीवर निशाणा साधला.  

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRajnath Singhराजनाथ सिंहRafale Dealराफेल डीलDefenceसंरक्षण विभागAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019