शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या निवडणुकीत १५७ कोटी जप्त; २0१४ च्या तुलनेत पाचपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 06:46 IST

Maharashtra Election 2019: यावर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये धनशक्तीचा मोठा वापर झाल्याचे दिसत आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : यावर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये धनशक्तीचा मोठा वापर झाल्याचे दिसत आहे. या निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने १५७ मद्य, अंमली पदार्थ, शस्त्रे व मूल्यवान वस्तू व रोकड धरून १५७ कोटी रुपये हस्तगत केले. गेल्या म्हणजे २0१४ च्या तुलनेत ही रक्कम पाचपट आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीच्या प्रचार काळात ६0 कोटी ६९ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली. याशिवाय ३३.४0 कोटी रुपयांचे मद्य, १९ कोटी ५२ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ तसेच शस्त्रे जप्त करण्यात आली. याखेरीज ५३ कोटी ३२ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि सोेने-चांदीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले.

महाराष्ट्रात २0१४ साली ३0 कोटी रुपये किंमतीची रोकड व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात, यासाठी आम्ही खास व्यवस्था ठेवली होती. मतदारांवर उमेदवारांनी प्रभाव वा दबाव टाकू नये, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. त्यासाठी राज्यात ११२ निरीक्षक नेमले होते. त्याशिवाय २९५ सहाय्यक निरीक्षक, १५६७ फिरती पथके, १६५८ दक्षता पथके नेमली होती.

याखेरीज ४७७ व्हिडीओ पथकेही सक्रिय होती. उमेदवारांचा रोजच्या रोज हिशेब पाहण्यासाठी २९५ पथके काम करीत होती. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे सा' घेण्यात आले. राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन केले होते.

हरयाणात २४.१७ कोटी जप्त

हरयाणामध्ये याच काळात ९.१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय ११ कोटींचे मद्य, ३. ९४ कोटींचे अमली पदार्थही ताब्यात घेण्यात आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ८.१ कोटी रुपये किमतीची रोकड व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानharyana election 2019हरियाणा निवडणूकPoliceपोलिस