शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभतील गर्दीचा स्थानिकांना मोठा फटका, होतोय त्रास; दूध, रेशनसह आवश्यक वस्तूंचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:49 IST

MahaKumbh 2025 : प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दीमुळे स्थानिक लोकांना ये-जा करणं देखील अवघड झालं आहे.

प्रयागराज महाकुंभसाठी कोट्यवधी भाविक येत आहेत. त्यामुळे संगम आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे भाविकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे गर्दीमुळे स्थानिक लोकांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूही मिळत नाहीत.

प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दीमुळे स्थानिक लोकांना ये-जा करणं देखील अवघड झालं आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, बॅरिकेडिंग आणि रस्ते बंद असल्याने लोक वेळेवर त्यांच्या कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. संपूर्ण शहराची व्यवस्था कोलमडताना दिसत आहे. कमी अंतर प्रवास करण्यासाठीही लोक दिवसभर वाहतूक कोंडीत अडकतात.

दैनंदिन वापराच्या वस्तूंचा तुटवडा

संगमला येणाऱ्या लोकांमुळे येथे अन्नधान्याची कमतरता आहे. एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, गर्दीमुळे स्थानिक लोकांना ये-जा करण्यात खूप त्रास होत आहे. रेशन मिळत नाही, दूधही मिळत नाही. वाहतूक कोंडीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं कठीण झालं आहे. लोकांनी घराबाहेर पडणं त्यामुळे आता बंद केलं आहे. लोक खूप गरज असेल तरच बाहेर पडत आहेत.

भाविकांनी काही वेळा गैरसोय झाल्याचं मान्य केलं असलं तरी, त्यांनी योगी सरकारच्या कामाचं देखील कौतुक केलं आणि त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केल्याचं सांगितलं. आम्हाला खूप बरं वाटत आहे. सरकारने येथील  व्यवस्था इतकी चांगली हाताळली आहे की इथे इतकी गर्दी असूनही आम्हाला जास्त अडचणी आल्या नाहीत. गंगेत स्नानही चांगलं झालं. येथील पोलीस प्रशासनाने खूप सहकार्य केलं आहे असं म्हटलं आहे.

टॅग्स :Prayagrajप्रयागराजUttar Pradeshउत्तर प्रदेश