शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

महाकुंभात अध्यात्माचा उपदेश देणारे मुमताज अली खान चर्चेत, श्री एम नावाने मिळाली ओळख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 22:05 IST

Mahakumbh 2025 : 2020 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Mahakumbh 2025 : पवित्र महाकुंभात अमृत स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक प्रयागराजमध्ये येत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून साधू-संत महाकुंभात दाखल झाले आहेत. 13 प्रमुख आखाड्यांव्यतिरिक्त मेळा परिसरात बांधलेल्या शिबिरांमध्ये अनेक साधू-सांत-बाबांची शिबिरे आहेत. मात्र यात एका मुस्लिम अध्यात्मिक गुरुचे शिबिर चर्चेचा विषय बनले आहे. दररोज शेकडो-हजारो भारतीय-विदेशी भाविक या शिबिरात येत आहेत. या गुरूचे नाव मुमताज अली खान असून त्यांना श्री एम, या नावाने ओळखले जाते. आता हे श्री एम कोण आहेत आणि त्यांची हिंदूंच्या सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रम का चर्चा होत आहे, हे जाणून घ्या...

केरळमधील मुस्लिम कुटुंबात जन्ममुमताज अली खान यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1949 रोजी केरळमधील त्रिवेंद्रम येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि हिमालयात राहायला गेले. येथे ते अनेक संतांच्या संपर्कात आले आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. यानंतर त्यांना मुमताज अलीऐवजी श्री एम किंवा मधुकर नाथ नावाने ओळखले जाऊ लागले. श्री एम सत्संग फाउंडेशन चालवतात आणि त्यांना 2020 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

आपल्या अध्यात्मिक जीवनाविषयी बोलताना ते सांगतात की, या जीवनात हा प्रवास वयाच्या 8 व्या वर्षी सुरू झाला, पण माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. माझे गुरू महेश्वरनाथ बाबांनी मला त्रिवेंद्रममध्ये शोधून काढले होते. इथे कोणीतरी आहे, ज्याला अध्यात्म शिकवायचे आहे, अशी माहिती त्यांना मिळाली होती. यावरून असे दिसून येते की, आमचे पूर्वीजन्माचे नाते आहे. बालपणीच्या या भेटीनंतर महेश्वरनाथ अदृश्य झाले आणि सुमारे 10 वर्षांनी बद्रीनाथच्या गुहेत पुन्हा भेटले. तोपर्यंत माझ्या आयुष्यात अध्यात्माची ठिणगी जागृत झाली होती. पुन्हा तीन वर्षे गुरूंकडे राहून त्यांनी दीक्षा घेतली.

सत्संग फाउंडेशनच्या माध्यमातून जनसेवाआपल्या गुरुंनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करत श्री एम जे काही शिकले ते जगाला सांगण्याच्या मार्गावर निघाले. या अंतर्गत त्यांनी सत्संग फाउंडेशनची स्थापना केली, ज्याचा उद्देश सर्व धर्मांचा गाभा शोधणे हा आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, वास्तविक ज्ञानासाठी गाभ्यापर्यंत जाण्याची गरज आहे. सत्संग फाऊंडेशन देखील त्याच मिशनवर कार्य करते. सर्व धर्माच्या साधकांच्या सभा आणि सत्संग आयोजित केले जातात.

सत्संग फाउंडेशन व्यतिरिक्त श्री एम देशभरात शाळा, रुग्णालये आणि लोककल्याण कार्यक्रम चालवतात. याशिवाय योग क्षेत्रातही त्यांचे प्राविण्य आहे. हे मिशन पुढे नेण्याच्या उद्देशाने श्री एम महाकुंभात पोहोचले आहेत. येथे ते जगभरातून येणाऱ्या भाविकांना आध्यात्मिक मार्गावर जाण्यासाठी प्रेरित करत आहेत. अनेक परदेशी भक्तही त्यांच्या शिबिरात येतात आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशHinduहिंदूMuslimमुस्लीम