शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

महाआघाडीचा प्रयोग फसला, भाजपची रणनीती यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:14 IST

अतिआत्मविश्वास नडला : सपा-बसपाची राजकीय खिचडी शिजली नाही

लखनऊ : उत्तर प्रदेशमधून भाजपला उखडून फेकण्याच्या संकल्पातून स्थापन झालेल्या सपा-बसप-रालोद आघाडीला अपेक्षेपेक्षा कमीच यश मिळाले. प्रदेशातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी कमीत कमी ६० जागा जिंकण्याची आशा आघाडीस होती. ती केवळ १५ जागा मिळाल्याने धुळीस मिळाली. राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजे आघाडीला अतिआत्मविश्वास नडला. भाजपच्या भक्कम रणनीतीमुळे राजकीय खिचडी शिजू शकली नाही.

मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब पाहता सपा-बसप-रालोद आघाडीचा प्रयोग अगदी अपयशी सिद्ध झाला. एकमेकांची मते मिळविण्याचा दावा करणाऱ्या सपा आणि बसपच्या मतांची टक्केवारी वाढण्याऐवजी घटली.निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सपाला २२.३५ टक्के मते मिळाली होती. तो आकडा घटून १७.९६ टक्क्यांवर आला. गेल्या वेळी बसपला १९.७७ टक्के मते मिळाली होती, ती यंदा १९.२६ टक्क्यांवर आली. रालोदची स्थिती ५ वर्षांपूर्वी जशी होती, तशीच आजही आहे. एकही जागा दोन्ही निवडणुकांमध्ये या पक्षाला मिळाली नाही. मात्र मतांची टक्केवारी ०.८६ वरून १.६७ टक्क्यापर्यंत वाढली.तसे पाहता आघाडी बसपसाठी लाभदायक ठरली. २०१४ मध्ये एकही जागा न मिळालेला हा पक्ष यंदा मात्र मतांची टक्केवारी घटूनही यशस्वी ठरला. यंदा बसपला १० जागांवर यश मिळाले. तर समाजवादी पक्षाला गेल्या वेळी असलेल्या ५ जागा राखत आनंद मानावा लागला. वरिष्ठ नेता शिवपाल सिंह यादव यांची नाराजी आणि स्वतंत्रपणे पक्ष स्थापन करून निवडणूक लढविण्यामुळे सपाचे नुकसान झाले.

राजकीयविश्लेषक प्रा. बद्री नारायण यांच्या मते आघाडी अपयशी ठरण्याची अनेक कारणे आहेत. सपा-बसप-रालोद आघाडीला यादव, मुस्लीम आणि जाट मतदारांच्या हक्काच्या मतांवर किल्ला जिंकू, असा विश्वास होता. मात्र भाजप ओबीसीमधील विविध जातींची एकजूट करत आघाडीवर मात करण्यासाठी बारकाईने काम करत आहे, याचा पत्ताच या आघाडीच्या नेत्यांना लागला नाही.अनेक छोट्या दलित जातींची मते अधिकतर भाजपच्या पदरात पडली. भाजपने या जातींना सरकारी योजनांशी जोडले. त्यामुळे या जातींमध्ये आशादायकता निर्माण झाली.अन्य एक राजकीय तज्ज्ञ परवेज अहमद यांच्या मते महाआघाडी केवळ मायावती आणि अखिलेश यांच्यातच झाली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनाने एकत्र येऊ शकले नाहीत.
मायावतींकडून आभार; अखिलेश विचारमंथनातबसपप्रमुख मायावती यांनी संभाव्य आघाडीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र सपाकडून त्याबद्दल ठाम बाब समोर आलेली नाही. मायावती निकालानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि रालोदप्रमुख चौधरी अजित सिंह यांनी पूर्ण प्रामाणिकपणा आणि निष्ठेने आघाडीचे उमेदवार निवडून यावेत यासाठी जीवापाड प्रयत्न केले. त्यासाठी आपण त्यांचे आभार मानतो, तर दुसरीकडे सपा विचारमंथनात गढली आहे. या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अखिलेश यादव यांनी शुक्रवारी पक्षाच्या नेत्यांसह बैठक घेतली. निकालांचा आढावा घेतला.