शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

महाआघाडीचा प्रयोग फसला, भाजपची रणनीती यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:14 IST

अतिआत्मविश्वास नडला : सपा-बसपाची राजकीय खिचडी शिजली नाही

लखनऊ : उत्तर प्रदेशमधून भाजपला उखडून फेकण्याच्या संकल्पातून स्थापन झालेल्या सपा-बसप-रालोद आघाडीला अपेक्षेपेक्षा कमीच यश मिळाले. प्रदेशातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी कमीत कमी ६० जागा जिंकण्याची आशा आघाडीस होती. ती केवळ १५ जागा मिळाल्याने धुळीस मिळाली. राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजे आघाडीला अतिआत्मविश्वास नडला. भाजपच्या भक्कम रणनीतीमुळे राजकीय खिचडी शिजू शकली नाही.

मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब पाहता सपा-बसप-रालोद आघाडीचा प्रयोग अगदी अपयशी सिद्ध झाला. एकमेकांची मते मिळविण्याचा दावा करणाऱ्या सपा आणि बसपच्या मतांची टक्केवारी वाढण्याऐवजी घटली.निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सपाला २२.३५ टक्के मते मिळाली होती. तो आकडा घटून १७.९६ टक्क्यांवर आला. गेल्या वेळी बसपला १९.७७ टक्के मते मिळाली होती, ती यंदा १९.२६ टक्क्यांवर आली. रालोदची स्थिती ५ वर्षांपूर्वी जशी होती, तशीच आजही आहे. एकही जागा दोन्ही निवडणुकांमध्ये या पक्षाला मिळाली नाही. मात्र मतांची टक्केवारी ०.८६ वरून १.६७ टक्क्यापर्यंत वाढली.तसे पाहता आघाडी बसपसाठी लाभदायक ठरली. २०१४ मध्ये एकही जागा न मिळालेला हा पक्ष यंदा मात्र मतांची टक्केवारी घटूनही यशस्वी ठरला. यंदा बसपला १० जागांवर यश मिळाले. तर समाजवादी पक्षाला गेल्या वेळी असलेल्या ५ जागा राखत आनंद मानावा लागला. वरिष्ठ नेता शिवपाल सिंह यादव यांची नाराजी आणि स्वतंत्रपणे पक्ष स्थापन करून निवडणूक लढविण्यामुळे सपाचे नुकसान झाले.

राजकीयविश्लेषक प्रा. बद्री नारायण यांच्या मते आघाडी अपयशी ठरण्याची अनेक कारणे आहेत. सपा-बसप-रालोद आघाडीला यादव, मुस्लीम आणि जाट मतदारांच्या हक्काच्या मतांवर किल्ला जिंकू, असा विश्वास होता. मात्र भाजप ओबीसीमधील विविध जातींची एकजूट करत आघाडीवर मात करण्यासाठी बारकाईने काम करत आहे, याचा पत्ताच या आघाडीच्या नेत्यांना लागला नाही.अनेक छोट्या दलित जातींची मते अधिकतर भाजपच्या पदरात पडली. भाजपने या जातींना सरकारी योजनांशी जोडले. त्यामुळे या जातींमध्ये आशादायकता निर्माण झाली.अन्य एक राजकीय तज्ज्ञ परवेज अहमद यांच्या मते महाआघाडी केवळ मायावती आणि अखिलेश यांच्यातच झाली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनाने एकत्र येऊ शकले नाहीत.
मायावतींकडून आभार; अखिलेश विचारमंथनातबसपप्रमुख मायावती यांनी संभाव्य आघाडीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र सपाकडून त्याबद्दल ठाम बाब समोर आलेली नाही. मायावती निकालानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि रालोदप्रमुख चौधरी अजित सिंह यांनी पूर्ण प्रामाणिकपणा आणि निष्ठेने आघाडीचे उमेदवार निवडून यावेत यासाठी जीवापाड प्रयत्न केले. त्यासाठी आपण त्यांचे आभार मानतो, तर दुसरीकडे सपा विचारमंथनात गढली आहे. या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अखिलेश यादव यांनी शुक्रवारी पक्षाच्या नेत्यांसह बैठक घेतली. निकालांचा आढावा घेतला.