शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

महाकुंभमध्ये अघोरी रुपात पाहून कुटुंबीयांना धक्का बसला; २७ वर्षानंतर झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:04 IST

२७ वर्षानंतर कुटुंबातून हरवलेला व्यक्ती प्रयागराजमधील महाकुंभात सापडल्याचा दावा केला जात आहे.

तुम्ही दिलीप कुमार यांचा हिंदी चित्रपट गंगा आणि जमुना पाहिला असेल. या चित्रपटात दोन जुळे भाऊ एका यात्रेत हरवतात. पण, पुढं काही महिन्यानंतर ते पुन्हा एकमेकांना भेटतात. अशा गोष्टी तुम्ही अनेक हिंदी चित्रपटात पाहिल्या असतील. कधी कधी मुलगा आईपासून हरवल्याचे दाखवले जाते. चित्रपटात ते पुन्हा एकमेकांना भेटल्याचं दिसतं. हे असं दृश्य चित्रपटात आपण अनेक वेळा पाहिलं आहे. पण, खऱ्या आयुष्यात अशा घटना कधीतरीच बघायला मिळतात. पण कधी कधी निसर्गाचा चमत्कार होतो किंवा तुम्ही त्याला योगायोग म्हणा, अशीच एक घटना प्रयागराजमधील कुंभमेळामध्ये घडली आहे. २७ वर्षापासून हरवलेला भाऊ पुन्हा सापडला आहे.

Plane Crash: 'ही वाईट घटना टाळायला हवी होती", डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात अपघाताबद्दल शंका

झारखंड येथील एक कुटुंब प्रयागराज येथे महाकुंभसाठी गेले होते. यावेळी त्यांचा एक नातेवाईक २७ वर्षापूर्वी हरवलेला सापडला. १९९८ मध्ये तो व्यक्ती त्या व्यक्तीचे नाव गंगासागर यादव असं आहे. २७ वर्षानंतर त्यांनी प्रयागराजमध्ये अघोरी सन्यासच्या  रुपात नातेवाईकांनी पाहिले. आता तो व्यक्ती बाबा राजकुमार या नावाने ओळखले जातात. त्यांचे वय ६५ वर्षे आहे. 

१९९८ मध्ये हरवले होते

१९९८ मध्ये गंगासागर झारखंड येथून पटना येथे गेले होते, यावेळी ते तिथून हरवले. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. पण काहीच पत्ता लागत नव्हता. त्यांची पत्नी देवी यांनी आपल्या दोन मुलांचा सांभाळ केला. 

गंगासागर यांच्या भावाने दिलेली माहिती अशी, 'आम्ही आमच्या भावाचा सगळीकडू शोध घेतला. पण काही केल्याने त्याचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेणे सोडले होते. पण काही दिवसापूर्वी आमच्या एका नातेवाईकाने कुंभमेळ्यात गंगासागरांसारखा दिसणारा एक साधू पाहिला. त्यांनी त्यांचा फोटो काढला आणि आम्हाला पाठवला. फोटो पाहिल्यानंतर, आम्ही लगेच त्याची बायको आणि तिच्या दोन्ही मुलांना घेऊन महाकुंभमध्ये पोहोचलो.

अघोरी बाबांनी वाराणसीचे संत असल्याचे सांगितले

आता मुरली यादव आणि त्यांचे कुटुंबीय त्या अघोरी बाबांना गंगासागर यादव म्हणून बोलवत आहेत. पण त्या बाबांनी या दाव्याला नकार दिला आहे. बाबांनी स्वतःला वाराणसीचे संत असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की माझा आणि गंगासागर याचा काही संबंध नाही.

दरम्यान, आता कुटुंबाने ते गंगासागर असल्याचा दावा करत त्यांच्या शरीरावर काही खुणा असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी कुटुंबाने कुंभमेळा प्रशासनाकडे मदत मागितली आहे. आणि बाबांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे.

यावर आता या कुटुंबाने सांगितले आहे की, आम्ही डीएनए चाचणी करणार आहे.  यामुळे खरं काय आहे ते समोर येईल. जर चाचणीमध्ये आमचा दावा खोटा ठरला तर आम्ही बाबा राजकुमार यांची माफी मागणार आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल