शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जयपूरमध्ये सुरू झाला साहित्याचा ‘महा-कुंभ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 03:02 IST

विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे!

- अपर्णा वेलणकर डिग्गी पॅलेस, जयपूर : नोबेल-पुलीत्झर-मॅन बुकर अशा मानाच्या पुरस्कार विजेत्यांसह पाचशेहून अधिक वक्त्यांची सत्रे, पंधरा भारतीय आणि बारा आंतरराष्ट्रीय भाषांचे प्रतिनिधित्व, पर्यावरणापासून कालिदासाच्या काव्यापर्यंत आणि कृत्रिम बुध्दिमत्तेच्या उदयापासून लोकशाही-अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भविष्यापर्यंत अगणित विषयांवरल्या चर्चांची रेलचेल आणि पाच दिवसांत तब्बल पाच लाखाहून अधिक श्रोत्यांच्या लगबगीने भरून वाहणारे उसळते मंडप... विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे!मराठी साहित्य संमेलनाच्या किडुकमिडुक संसाराची रडगाणी ऐकून किटलेले कान संपन्नतेच्या अभिजात स्वरांनी बहरून टाकणाऱ्या या लिट-फेस्टचे गुरुवारी सकाळी गुलाबी थंडीत डिग्गी पॅलेसच्या आवारात उद्घाटन झाले. ‘‘विज्ञान हे सर्वज्ञ, सर्वसाक्षी नव्हे, कारण त्याला भूत-वर्तमान-भविष्याची सांगड घालणारी प्रज्ञा अवगत नसते. म्हणून विज्ञानाने कला आणि संस्कृतीपुढे नम्र असले पाहिजे,’’ अशी मांडणी करणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ सर वेंकी रामकृष्णन यांच्या बीजभाषणाने या लिट-फेस्टचा प्रारंभ झाला.या ‘साहित्य-कुंभा’चे हे बारावे वर्ष आहे. येत्या २८ जानेवारीपर्यंत चालणाºया या साहित्योत्सवासाठी उपस्थित राहणाºयांपैकी ७० टक्क्यांहून अधिकांचे वय तीस वर्षांच्या आतले आहेत.इथे बड्या कंपन्यांनी स्वत:हून ओतलेला प्रायोजकत्वाचा पैसा आहे, त्याच्या उत्तम विनियोगाची दृष्टी आहे, राजकीय पुढाºयांना अतिरेकी महत्त्व देण्याची कारणे नाहीत.>मोदी माझे शब्द खरे ठरवताहेत - थरूरपंतप्रधान मोदींसाठी मी वापरलेले ‘पैरॉडॉक्सिकल प्राईममिनिस्टर’ हे शब्द खरे करून दाखवण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे, त्याला माझा काय इलाज?- असा प्रश्न करणारे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या सत्राच्या वेळी अचानक वादळी पाऊस सुरू झाला, तरी श्रोते जागचे हलले नव्हते!