शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'रामाची टीआरपी घटल्याने भाजपकडून महाकालीचे नारे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 15:48 IST

सध्या ममता बॅनर्जी मुस्लीम समुदायाला आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांनी कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे त्या वारंवार सांगत आहेत. त्यातच भाजपकडून जय श्रीरामच्या नाऱ्यांसोबत महाकालीच्या घोषणा भाजपकडून देण्यात येत आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये २०२१ साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कमळ फुलवण्यासाठी संपूर्ण ताकतीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली जुगलबंदी अद्याप कायम आहे. भारतीय जनता पक्षाने एक पाऊल पुढे टाकत श्रीरामाच्या नाऱ्याला आता महाकालीच्या नाऱ्यांची जोड दिली आहे. यावरून ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

सध्या ममता बॅनर्जी मुस्लीम समुदायाला आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांनी कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे त्या वारंवार सांगत आहेत. त्यातच भाजपकडून जय श्रीरामच्या नाऱ्यांसोबत महाकालीच्या घोषणा भाजपकडून देण्यात येत आहे. त्यावरून तृणमूलने भाजपला टोला लगावला आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, काही लोकांनी मला सांगितले की, दिलीप घोष यांनी जय श्रीरामसोबत जय महाकालीच्या घोषणा देण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ममता बॅनर्जी तिथे होत्या. तसेच रामाची टीआरपी घटली असून महाकालीची टीआरपी वाढल्याचे अभिषेक यांनी म्हटले.

बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवल्यानंतर भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले की, आता राज्यात आपले नारे जय श्रीराम आणि जय महाकाली असतील. बंगाल महाकालीची धरती असून आपल्याला महाकालीचा आशीर्वाद हवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान टीएमसी प्रमुख ममता यांनी ईद निमित्त म्हटले की, त्यागाचे नाव हिंदू, इमानदारी म्हणजे मुस्लीम, प्रेमाचे प्रतीक ख्रिश्चन आणि बलिदानाचे नाव शिख असून यातून आपला हिंदुस्तान तयार झाला आहे. या हिंदुस्तानाची रक्षा आपल्याला करायची आहे. जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जायेगा, हीच तृणमूलची घोषणा असल्याचे ममता यांनी सांगितले.