शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

'रामाची टीआरपी घटल्याने भाजपकडून महाकालीचे नारे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 15:48 IST

सध्या ममता बॅनर्जी मुस्लीम समुदायाला आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांनी कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे त्या वारंवार सांगत आहेत. त्यातच भाजपकडून जय श्रीरामच्या नाऱ्यांसोबत महाकालीच्या घोषणा भाजपकडून देण्यात येत आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये २०२१ साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कमळ फुलवण्यासाठी संपूर्ण ताकतीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली जुगलबंदी अद्याप कायम आहे. भारतीय जनता पक्षाने एक पाऊल पुढे टाकत श्रीरामाच्या नाऱ्याला आता महाकालीच्या नाऱ्यांची जोड दिली आहे. यावरून ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

सध्या ममता बॅनर्जी मुस्लीम समुदायाला आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांनी कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे त्या वारंवार सांगत आहेत. त्यातच भाजपकडून जय श्रीरामच्या नाऱ्यांसोबत महाकालीच्या घोषणा भाजपकडून देण्यात येत आहे. त्यावरून तृणमूलने भाजपला टोला लगावला आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, काही लोकांनी मला सांगितले की, दिलीप घोष यांनी जय श्रीरामसोबत जय महाकालीच्या घोषणा देण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ममता बॅनर्जी तिथे होत्या. तसेच रामाची टीआरपी घटली असून महाकालीची टीआरपी वाढल्याचे अभिषेक यांनी म्हटले.

बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवल्यानंतर भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले की, आता राज्यात आपले नारे जय श्रीराम आणि जय महाकाली असतील. बंगाल महाकालीची धरती असून आपल्याला महाकालीचा आशीर्वाद हवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान टीएमसी प्रमुख ममता यांनी ईद निमित्त म्हटले की, त्यागाचे नाव हिंदू, इमानदारी म्हणजे मुस्लीम, प्रेमाचे प्रतीक ख्रिश्चन आणि बलिदानाचे नाव शिख असून यातून आपला हिंदुस्तान तयार झाला आहे. या हिंदुस्तानाची रक्षा आपल्याला करायची आहे. जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जायेगा, हीच तृणमूलची घोषणा असल्याचे ममता यांनी सांगितले.