शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

बालाकोटमध्ये हल्ला झालेल्या ठिकाणचे मदरसे आजही उभेच, रॉयटर्सचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 06:50 IST

पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे व अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारताचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे व अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारताचे म्हणणे आहे. मात्र त्या जागी असलेल्या मदरसा संकुलात आजही सहा इमारती उभ्या आहेत असा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेने उच्चप्रतीच्या उपग्रह छायाचित्रांच्या आधारे केला आहे.भारताच्या लढाऊ विमानांनी हल्ला केल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे ४ मार्च रोजी अमेरिकेतल्या सॅनफ्रॅन्सिस्को येथील प्लॅनेट लॅब्ज या खाजगी कंपनीने उपग्रहाद्वारे त्या जागेची छायाचित्रे टिपली आहेत. बालाकोटमध्ये हल्ला झाला त्या ठिकाणची उपग्रहाद्वारे काढलेली उच्चप्रतीची छायाचित्रे आजवर सर्वांसाठी उपलब्ध नव्हती. प्लॅनेट लॅब्जने उपग्रहाद्वारे या जागेची ७२ सेमी इतक्या जवळून छायाचित्रे काढली आहेत. रॉयटर्सने म्हटले आहे की, या जागेच्या एप्रिल महिन्यात व आता काढलेल्या छायाचित्रांत तेथील स्थितीत फारसा फरक पडल्याचे निदर्शनास आलेले नाही. बॉम्बहल्ल्यांमुळे मदरसा संकुलात असलेल्या इमारतींचे नुकसान झाले आहे, भिंती पडल्या आहेत, आजूबाजूची झाडे कोसळली आहेत अशा कोणत्याही खाणाखुणा या छायाचित्रांत आढळून आल्या नाहीत.>नुकसानाबाबत संभ्रम कायमबालाकोटमधील हल्ल्यात किती दहशतवादी मारले याबद्दल मोदी सरकारने मौन पाळले आहे. हा आकडा सांगण्यास भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनीही नकार दिला होता. मात्र या हल्ल्यात २५० दहशतवाद्यांना मारण्यात आले असा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नुकताच केला. केंद्रातले काही मंत्री हा आकडा ३५० असल्याचे खासगीत सांगत होते. हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे नेमके किती नुकसान झाले, किती दहशतवाद्यांना मारले याचे पुरावे देण्याची मागणी ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विरोधी पक्षनेत्यांनी केली होती. त्या साऱ्या गोंधळात आता रॉयटर्सच्या वृत्तामुळे आणखी भर पडली आहे.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल