शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

बालाकोटमध्ये हल्ला झालेल्या ठिकाणचे मदरसे आजही उभेच, रॉयटर्सचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 06:50 IST

पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे व अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारताचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे व अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारताचे म्हणणे आहे. मात्र त्या जागी असलेल्या मदरसा संकुलात आजही सहा इमारती उभ्या आहेत असा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेने उच्चप्रतीच्या उपग्रह छायाचित्रांच्या आधारे केला आहे.भारताच्या लढाऊ विमानांनी हल्ला केल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे ४ मार्च रोजी अमेरिकेतल्या सॅनफ्रॅन्सिस्को येथील प्लॅनेट लॅब्ज या खाजगी कंपनीने उपग्रहाद्वारे त्या जागेची छायाचित्रे टिपली आहेत. बालाकोटमध्ये हल्ला झाला त्या ठिकाणची उपग्रहाद्वारे काढलेली उच्चप्रतीची छायाचित्रे आजवर सर्वांसाठी उपलब्ध नव्हती. प्लॅनेट लॅब्जने उपग्रहाद्वारे या जागेची ७२ सेमी इतक्या जवळून छायाचित्रे काढली आहेत. रॉयटर्सने म्हटले आहे की, या जागेच्या एप्रिल महिन्यात व आता काढलेल्या छायाचित्रांत तेथील स्थितीत फारसा फरक पडल्याचे निदर्शनास आलेले नाही. बॉम्बहल्ल्यांमुळे मदरसा संकुलात असलेल्या इमारतींचे नुकसान झाले आहे, भिंती पडल्या आहेत, आजूबाजूची झाडे कोसळली आहेत अशा कोणत्याही खाणाखुणा या छायाचित्रांत आढळून आल्या नाहीत.>नुकसानाबाबत संभ्रम कायमबालाकोटमधील हल्ल्यात किती दहशतवादी मारले याबद्दल मोदी सरकारने मौन पाळले आहे. हा आकडा सांगण्यास भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनीही नकार दिला होता. मात्र या हल्ल्यात २५० दहशतवाद्यांना मारण्यात आले असा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नुकताच केला. केंद्रातले काही मंत्री हा आकडा ३५० असल्याचे खासगीत सांगत होते. हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे नेमके किती नुकसान झाले, किती दहशतवाद्यांना मारले याचे पुरावे देण्याची मागणी ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विरोधी पक्षनेत्यांनी केली होती. त्या साऱ्या गोंधळात आता रॉयटर्सच्या वृत्तामुळे आणखी भर पडली आहे.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल