शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

Madhya Pradesh: सुशासनाचे मुद्दे मांडणारा मध्य प्रदेशचा पहिला सुशासन अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 06:31 IST

Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या पहिल्या सुशासन अहवालात नागरी विकास, उद्योग, सार्वजनिक आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण उणिवांकडे लक्ष वेधत मध्य प्रदेशात सुशासनला चालना देण्यासाठी दीर्घावधीच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : मध्य प्रदेशच्या पहिल्या सुशासन अहवालात नागरी विकास, उद्योग, सार्वजनिक आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण उणिवांकडे लक्ष वेधत मध्य प्रदेशात सुशासनला चालना देण्यासाठी दीर्घावधीच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. सोमवारी नवी दिल्लीत हा ३६० पान सुशासन अहवाल जारी करण्यात आला.या अहवालात शिवराज सिंह चौहान सरकारच्या १७ वर्षातील सुशासनासंबंधी करण्यात आलेल्या उपाय-योजनांबाबत भाष्य करण्यात आले असून राज्याच्या विकासाला गती देण्यासंबंधी अनेक शिफारशीही करण्यात आल्या आहेत.अटल बिहारी वाजपेयी सुशासन आणि धोरण विश्लेषण संस्थेच्या (एआयजीजीपीए) वतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ही संस्था मध्य प्रदेशच्या नियोजन आयोगासारखे काम करते. सुशासन अहवाल जारी करणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य आहे. सरकारी ते नागरी सेवा अद्ययावत करणे जरुरी आहे. कृषी क्षेत्राबाबत अहवालात असे निरीक्षण नोंदवित आले आहे की, राज्याने व्यवसाय सुलभीकरण पूरक धोरणांवर भर द्यायला पाहिजे. तसेच व्यापार आणि शेतीशी संबंधित वाद वेगाने निकाली काढले पाहिजे, असे अहवालात म्हटले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले की, मध्य प्रदेश एकेकाळी बीमारु राज्य होते; परंतु, आज ही ओळख पुसून राज्याने सुशासनासंबंधी अनेक मापदंड स्थापन केले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, डाॅ. जितेंद्र सिंह आणि फगन सिंह कुलस्ते आदी मान्यवर उपस्थित होते. एआयजीजीपीएचे चेअरमन प्रो. सचिन चतुर्वेदी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, समाधान ऑनलाइन, सीएम जनसेवा, सार्वजनिक सेवा अधिनियम आदी योजनामुळे सुशासनात मध्य प्रदेशची चांगली कामगिरी आहे. तथापि, लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी सुधारणा करणे जरुरी आहे. सर्वांगीण विकासासाठी सुशासनाच्या सर्वोत्तम पद्धतीचे दस्तावेजीकरण करणे, हे आमचे उद्दिष्ट होते.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेश