शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

भीषण वास्तव! भारतातील 'या' गावात स्वातंत्र्यानंतरही उपलब्ध नाही वीज, पाणी, पक्के रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 13:25 IST

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं एक आदिवासी गाव येथे आहे. या गावात वीज नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि पक्का रस्ता देखील नाही.

मध्य प्रदेशमध्ये सिंगरौली जिल्हा आहे. हे ठिकाण कोळसा आणि वीज उत्पादनासाठी ओळखलं जाते. सिंगरौलीला भारताची ऊर्जा राजधानी देखील म्हटलं जातं. असं सगळं असूनही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं एक आदिवासी गाव येथे आहे. या गावात वीज नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि पक्का रस्ता देखील नाही.

ग्रामस्थांचं जीवन हे अनेक अडचणींनी भरलेलं आहे. छोट्या-छोट्या सोयी-सुविधांसाठी लोकांना परिस्थितीशी झगडावं लागत आहे. वीज नसल्याने गावात अंधार असतो. रात्री भयंकर परिस्थिती असते. पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. येथे लोकांना पाणी आणण्यासाठी खूप लांब चालत जावं लागतं. स्वत:कडे असलेलं पाणी संपलं तर आजूबाजूच्या लोकांकडे उरलेल्या पाण्यावर जगावं लागतं.

गावामध्ये काँक्रीटचे पक्के रस्ते असल्याने हे गाव बाहेरच्या जगापासून अद्यापही खूप दूर आहे. पावसाळ्यात येथील रस्ते चिखलाने तुडुंब भरल्याने परिसरातील वाहतूक ठप्प होऊन जाते. याठिकाणी कोणी आजारी पडल्यास उपचारासाठी जवळपास साधं रुग्णालय देखील नाही.

रुग्णवाहिकेसारख्या सामान्य व अत्यावश्यक सुविधांपासूनही हे गाव वंचित आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोक खाटेच्या साहाय्याने नातेवाईकांना घेऊन जातात. गावातील आदिवासींना ग्रामीण शासन व प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मूलभूत सुविधा दिल्यास गावाचा विकास आणि ग्रामस्थांचं जीवनमान हे सुधारू शकतं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीelectricityवीजroad transportरस्ते वाहतूक