शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

भीषण वास्तव! भारतातील 'या' गावात स्वातंत्र्यानंतरही उपलब्ध नाही वीज, पाणी, पक्के रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 13:25 IST

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं एक आदिवासी गाव येथे आहे. या गावात वीज नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि पक्का रस्ता देखील नाही.

मध्य प्रदेशमध्ये सिंगरौली जिल्हा आहे. हे ठिकाण कोळसा आणि वीज उत्पादनासाठी ओळखलं जाते. सिंगरौलीला भारताची ऊर्जा राजधानी देखील म्हटलं जातं. असं सगळं असूनही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं एक आदिवासी गाव येथे आहे. या गावात वीज नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि पक्का रस्ता देखील नाही.

ग्रामस्थांचं जीवन हे अनेक अडचणींनी भरलेलं आहे. छोट्या-छोट्या सोयी-सुविधांसाठी लोकांना परिस्थितीशी झगडावं लागत आहे. वीज नसल्याने गावात अंधार असतो. रात्री भयंकर परिस्थिती असते. पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. येथे लोकांना पाणी आणण्यासाठी खूप लांब चालत जावं लागतं. स्वत:कडे असलेलं पाणी संपलं तर आजूबाजूच्या लोकांकडे उरलेल्या पाण्यावर जगावं लागतं.

गावामध्ये काँक्रीटचे पक्के रस्ते असल्याने हे गाव बाहेरच्या जगापासून अद्यापही खूप दूर आहे. पावसाळ्यात येथील रस्ते चिखलाने तुडुंब भरल्याने परिसरातील वाहतूक ठप्प होऊन जाते. याठिकाणी कोणी आजारी पडल्यास उपचारासाठी जवळपास साधं रुग्णालय देखील नाही.

रुग्णवाहिकेसारख्या सामान्य व अत्यावश्यक सुविधांपासूनही हे गाव वंचित आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोक खाटेच्या साहाय्याने नातेवाईकांना घेऊन जातात. गावातील आदिवासींना ग्रामीण शासन व प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मूलभूत सुविधा दिल्यास गावाचा विकास आणि ग्रामस्थांचं जीवनमान हे सुधारू शकतं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीelectricityवीजroad transportरस्ते वाहतूक