शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भीषण वास्तव! भारतातील 'या' गावात स्वातंत्र्यानंतरही उपलब्ध नाही वीज, पाणी, पक्के रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 13:25 IST

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं एक आदिवासी गाव येथे आहे. या गावात वीज नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि पक्का रस्ता देखील नाही.

मध्य प्रदेशमध्ये सिंगरौली जिल्हा आहे. हे ठिकाण कोळसा आणि वीज उत्पादनासाठी ओळखलं जाते. सिंगरौलीला भारताची ऊर्जा राजधानी देखील म्हटलं जातं. असं सगळं असूनही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं एक आदिवासी गाव येथे आहे. या गावात वीज नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि पक्का रस्ता देखील नाही.

ग्रामस्थांचं जीवन हे अनेक अडचणींनी भरलेलं आहे. छोट्या-छोट्या सोयी-सुविधांसाठी लोकांना परिस्थितीशी झगडावं लागत आहे. वीज नसल्याने गावात अंधार असतो. रात्री भयंकर परिस्थिती असते. पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. येथे लोकांना पाणी आणण्यासाठी खूप लांब चालत जावं लागतं. स्वत:कडे असलेलं पाणी संपलं तर आजूबाजूच्या लोकांकडे उरलेल्या पाण्यावर जगावं लागतं.

गावामध्ये काँक्रीटचे पक्के रस्ते असल्याने हे गाव बाहेरच्या जगापासून अद्यापही खूप दूर आहे. पावसाळ्यात येथील रस्ते चिखलाने तुडुंब भरल्याने परिसरातील वाहतूक ठप्प होऊन जाते. याठिकाणी कोणी आजारी पडल्यास उपचारासाठी जवळपास साधं रुग्णालय देखील नाही.

रुग्णवाहिकेसारख्या सामान्य व अत्यावश्यक सुविधांपासूनही हे गाव वंचित आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोक खाटेच्या साहाय्याने नातेवाईकांना घेऊन जातात. गावातील आदिवासींना ग्रामीण शासन व प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मूलभूत सुविधा दिल्यास गावाचा विकास आणि ग्रामस्थांचं जीवनमान हे सुधारू शकतं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीelectricityवीजroad transportरस्ते वाहतूक